प्रतिनिधी/चिकोडी: सोमवारी रात्री अचानक पडलेल्या वादळी पावसाने चिकोडी तालुक्यातील अनेक भागात मोठे नुकसान झाले. काडापूर येथे वादळ व पावसाने काही घरांची पडझड झाली. उभी पिके काढणीस आली असताना वादळी पावसाने या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
वादळी पावसाने उभी पिके भूईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
काडापूर अनेक घरांची कौले उडाली असून घरातील धान्य, जिवनोपयोगी साहित्यांची नासाडी झाली असून ही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. काडापूरे येथे पडझड आलेल्या घरांची तालुका प्रशासनाकडुन पाहणी करुन योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त अर्जुन गुरुनाथ यांनी केली आहे.