इचलकरंजी/प्रतिनिधी
गडहिंग्लज विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची सोमवारी सायंकाळी रत्नागिरी येथे अप्पर पोलीस अधीक्षकपदी बदली झाली. त्या लवकरच रत्नागिरीमध्ये रुजू होणार आहेत. अप्पर अधीक्षक गायवाड यांनी संवेदनशील असलेल्या इचलकरंजीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडू दिली नाही.
गृह विभागाने सोमवार राज्यातील तब्बल 104 पोलिस उपायुक्त, अप्पर अधीक्षक, पोलिस अधीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये अप्पर पोलीस अधिक्षक गायकवाड यांचा समावेश आहे.