माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केलेले मत
वृत्तसंस्था / लंडन
ऑस्ट्रेलियन संघाला उसळत्या ओव्हल खेळपट्टीचा विचार करता कागदावर थोडीशी जास्त अनुकूलता दिसत असली, तरी माजी खेळाडू रवी शास्त्राr आणि रिकी पाँटिंग या दोघांच्याही मते, बुधवारपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी स्पर्धेसाठीची भारताची तयारी जास्त चांगली आहे. याचे एक कारण आयपीएल आहे. .
शास्त्राr, पाँटिंग आणि पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वसीम अक्रम या सर्वांना वाटते की, ओव्हलवरील खेळपट्टी नेहमीपेक्षा अधिक ताजीतवानी राहील. कारण 140 वर्षांच्या इतिहासात जूनमध्ये कधीही येथे कसोटी सामना आयोजित केला गेलेला नाही. 2021 मध्ये शुभारंभी जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघाला मार्गदर्शन केलेले माजी मुख्य प्रशिक्षक शास्त्राr यांना वाटते की, जसप्रीत बुमराह उपलब्ध असता, तर भारताचे पारडे अधिक जड झाले असते.
जर तुम्ही वेगवान गोलंदाजीकडे बघितले, तर मी म्हणेन की, जर बुमराह असता, तर मोहम्मद शमी, बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा मारा हा ऑस्ट्रेलियन माऱ्याची बरोबरी करणारा राहिला असता. पण स्टार्क, कमिन्ससह ऑस्ट्रेलियन आक्रमणाचा विचार करता कदाचित तिथे तंदुरुस्तीची बाब लागू होऊ शकेल, असे ‘आयसीसी’च्या ‘आफ्टरनून विथ टेस्ट लिजंड्स’ या कार्यक्रमात शास्त्राr म्हणाला.
शास्त्राrच्या मते, जरी ते दोन महिने ‘टी20’ क्रिकेट खेळलेले असले, तरी खेळाच्या अवधीमुळे फरक पडतो. पाँटिंग आणि अक्रम या दोघांनीही त्याच्याशी सहमती दर्शवली. ‘तंदुऊस्तीची बाब महत्त्वाची ठरू शकते. तुम्ही थोडे क्रिकेट खेळलेले असणे आवश्यक असते आणि पाच दिवस सहा तास मैदानावर राहणे हे दररोज दोन तास नेटमध्ये गोलंदाजी करण्यापेक्षा वेगळे आहे’ याकडे शास्त्रीने लक्ष वेधले. शमी कदाचित महत्त्वाचा घटक ठरेल, कारण तो खूप क्रिकेट खेळत आला आहे, असे त्याने सांगितले.
भरपूर ‘टी20’ क्रिकेट खेळणे चांगले की, जास्त न खेळता ताजेतवाने राहणे चांगले याविषयी पाँटिंगही द्विधा मनस्थितीत दिसला. खेळण्याच्या ताणाच्या मुद्यावर अक्रमची भूमिका मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. ‘मला एक खेळाडू या नात्याने क्रिकेट खेळलेले आवडते. जोपर्यंत मी खेळत आहे तोपर्यंत स्वरूप कुठले याने काही फरक पडत नाही. आयपीएलसारखी स्पर्धा खेळणे हे चांगले आहे’, असे मत त्याने व्यक्त केले.
इंग्लंडमध्ये एका दशकाहून अधिक काळ काऊंटी क्रिकेट खेळलेल्या अक्रमच्या मते, ओव्हलवरील या कसोटी सामन्यात वेगळी परिस्थिती दिसून येईल. ‘ओव्हलवर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात खेळपट्टी कोरडी असताना कसोटी सामना खेळला जातो. पण यावेळी ही एक ताजी खेळपट्टी आहे आणि ती जूनच्या सुऊवातीची आहे. त्यामुळे त्यावर चेंडू बराच उसळेल. शिवाय ‘ड्यूक्स’ चेंडू खूप जास्त स्विंग होतो. त्यामुळे मला वाटते की, ऑस्ट्रेलियाचे पारडे जरा जड असेल’, असे मत अक्रमने व्यक्त केले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पाँटिंगच्या मते, जून महिन्यातील ओव्हलवरील परिस्थिती त्याला इंग्लंडऐवजी मायदेशातील परिस्थितीची अधिक आठवण करून देते.