पहिला उपनगरात सुविधा दया… मगच हद्दवाढ करा; ग्रामस्थांचा तीव्र विरोध, गावातील सर्व व्यवहार ठेवले बंद
कळंबा :
कळंबा (ता.करवीर) येथील ग्रामस्थांनी हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शवत आज, गुरुवारी गाव बंदची हाक देत सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आले. कोल्हापूर शहराची प्रस्तावित हद्दी वाढीच्या निषेध करत गावच्या मुख्य मार्गावर पदयाञा काढण्यात आली. तसेच गावातील सर्व व्यवहार बंद करून हद्द वाढीला विरोध दर्शवण्यात आला. यावेळी प्रस्तावित हद्दवाढ करण्याचा निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
कळंबा येथील हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने गुरुवारी कळंबा बंद करण्याची हाक देण्यात आली होती. या अनुषंगाने कळंबा हद्द वाढविरोधी कृती समितीने कळंबा ग्रामपंचायत येथे एकत्र येत गाव बंद ठेवून एकजुटीने हद्दवाढीला विरोध दर्शविला. महापालिकेत समाविष्ट असलेल्या प्रभागात उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा मिळत नाहीत, परंतु, जिल्हापरिषद, पंचायत समिती, तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात सुविधा पायाभूत सुविधा पुरविण्यास सक्षम आहोत. शहरात सर्वच योजना रखडल्या आहेत. अर्थपूर्ण व्यवहारामुळे महापालिकेचे प्रतिमा मलिन झाली आहे; त्याकडे लक्ष द्या, यावेळी विरोधी कृती समिती सदस्यांनी सरपंच, सदस्य ग्रामस्थांनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोल्हापूर महानगरपालिका आपल्या नागरिकांना सेवा देण्यात अपयशी ठरली आहे. हद्दीतील गावांचा समावेश करून कर वसूल करण्याचे मनसूबे रचत आहे. परंतु हद्दवाडीमध्ये कळंबा गावला समाविष्ट करू नये. कळंबा गावं आम्ही कधीही हद्दवाढीमध्ये समाविष्ट होऊ देणार नाही असा निश्चय करत हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी गाव बंद करुन हद्दवाढ विरोधात एल्गार पुकारला.
यावेळी हद्दवाढ विरोधी कृती समिती यावेळी सरपंच सुमन गुरव,पंचायत समीतीच्या माजी सभापती मीनाक्षी पाटील, छाया भवड, बाजीराव पोवार, रोहीत मीरजे, भगवान पाटील, दिपक तिवले, विकास पोवार, प्रकाश कदम, उदय जाधव, अरुण टोपकर, विश्वास गुरव, दिलीप टीपुगडे, दिलीप मीरजे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य,गावातील विविध तालीम,संस्था,संघटनांचे पदाधिकारी,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
कोल्हापूर महापालिकेने पहिला कळंबा लगतच्या उपनगरांचा विकास करावा. मात्र आज गावा शेजारी असण्राया उपनगरामध्ये महानगरपालिका पूर्ण क्षमतेने सोई – सुविधा देण्यास असमर्थ ठरली आहे. उपनगरामध्ये अनेक गैरसोयी असून मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरवस्था दिसून येते त्यांना पहिल्या सुखसोयी द्याव्यात.
सुमन गुरव सरपंच कळंबा
महापालिकेने आधी ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांचे निरासरण करून गावांचा विकास कशा पद्धतीने करणार याचे रोल मॉडेल तयार करावे. त्याचबरोबर उपनगरांचा सर्वांगीण विकास करावा गावाचा विकास करायला महानगरपालिकेचा कर ग्रामीण जनतेला न सोसनारा आहे. तलाव लगत कळंबा ग्रामस्थांच्या मोठी शेती व्यवसाय त्याचबरोबर शेतीवर अवलंबून असणारा दुग्धव्यवसाय हद्दवाढीमुळे धोक्यात येवू शकतो.
विकास पोवार ( बावडेकर) उपसरपंच