केदारनाथ दुर्घटनेत वाचवले होते इतरांचे प्राण
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मणिपूरमध्ये गेल्या आठवडय़ात झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत आतापर्यंत 40 हून अधिक जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. अजूनही काही लोक आणि जवान ढिगाऱयाखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात असून घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे. या दुर्घटनेमध्ये छत्तिसगडमधील भिलाई येथील रहिवासी लेफ्टनंट कर्नल कपिल देव पांडे हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव सोमवारी इम्फाळहून लष्कराच्या दिल्ली मुख्यालयात आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर नवी दिल्लीतील बेरार स्क्वेअर मुक्तीधाम येथे पूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत लेफ्टनंट कर्नल कपिल देव पांडे यांनी उत्तराखंडमध्ये काही वर्षांपूर्वी घडलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कित्येक लोकांना वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत बचावकार्य राबवले हेते.
1 डिसेंबर 1979 रोजी भिलाई येथे जन्मलेल्या लेफ्टनंट कर्नल कपिल देव पांडे यांचे लहानपणापासूनच सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी शालेय स्तरापासूनच तयारी सुरू केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सेक्टर 10 च्या वरि÷ माध्यमिक विद्यालयातून केले. सैन्यात भरती होण्याच्या उद्देशाने त्यांनी एनसीसीमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर सीडीएस परीक्षा उत्तीर्ण होत त्यांनी आपले अभ्यासू व्यक्तिमत्त्व सिद्ध केले होते.