चारा-पाण्याविना वन्यप्राणी सैरभैर, वनखात्याने योग्य पावले उचलावीत
बेळगाव : उन्हाचा तडाखा वाढू लागला असून पारादेखील 35 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाने वनक्षेत्रातील प्राणीदेखील सैरभैर होऊ लागले आहेत. चारा, पाण्याअभावी वन्यप्राणी मानवीवस्तीत येण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे वन्यक्षेत्रात चारा-पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्राणीप्रेमींतून होऊ लागली आहे. डोंगर परिसरात अलीकडे गवी, हरिण, तरस, रानडुक्कर, मोर यासह इतर प्राण्यांची संख्या वाढू लागली आहे. मात्र वाढत्या उन्हामुळे वन्यप्राण्यांना अˆपाणी मिळत नसल्याने त्यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. चारा व पाण्याच्या शोधार्थ प्राणी सैरभैर होऊन मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. त्यामुळे वनखात्याने योग्य उपाययोजना राबवून वनक्षेत्रात वन, तलाव किंवा पाणवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात डोंगर परिसरात चारा, पाण्याची कमतरता असते. दरम्यान, वन्यप्राणी चारा पाण्याच्या शोधात गावात किंवा शहरात येऊ शकतात. दरम्यान, चारा पाण्याविना काही वन्यप्राण्यांना जीवदेखील गमवावा लागतो. वन्यप्राण्याची भटकंती थांबविण्यासाठी वनक्षेत्रात पाणी आणि चाऱ्यांचा साठा असणे आवश्यक आहे. दरम्यान जंगल परिसरात खायला काही मिळत नसल्याने वन्यप्राणी डेंगरपायथ्याशी असलेल्या शिवारातील पिकांची नासधूस करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. डेंगर परिसरात वन्यप्राण्यांची व्यवस्था झाल्यास हे नुकसानदेखील थांबणार आहे. वन्यप्राण्यांची चारा आणि पाण्याची समस्या दूर करण्यासाठी वनखात्याने योग्य पावले उचलावीत, अशी मागणी वन्यप्रेमींतून होत आह