Rajesh Kshirsagar News : राज्य शासनाकडून छत्रपती राजाराम तलावाच्या पाणलोट क्षेत्रात कन्व्हेन्शन सेंटर उभारले जाणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून तलावात सिमेंटच्या इमारती उभारून शासन काय साध्य करणार आहे, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने या सेंटरला विरोध केला आहे. यासंदर्भात छत्रपती राजाराम तलाव वाचविण्यासाठी जन आंदोलनाचा निर्धार केला आहे.आज सकाळी 10 वाजता तलावात उभे राहुन या जनआंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. याचे नेतृत्व शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले. या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रतीक्रिया दिली आहे.फक्त विरोधाला विरोध करणं हे अत्यंत चुकीचे आहे.काम होऊच द्यायचं नाही आणि करूनही देणार अशा भूमिका आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोल्हापुर शहरात गेली 30 ते 35 वर्षात हद्दवाढ,खंडपीठ आणि कन्व्हेन्शन सेंटर हे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित होते. यातील प्रमुख कन्व्हेन्शन सेंटरचा प्रस्न मार्गी लागला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी 100 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या सेंटरसाठी जी जागा निवडण्यात आली आहे त्याच्या बांधकामासाठी सर्व नियम पाळण्यात आलेले आहेत.राजाराम तलावाची कोणतीही हाणी होणार नाही.फक्त विरोधाला विरोध करणं हे अत्यंत चूकीचं आहे.काल याबाबत प्रझेंन्टेशन झालं यात बऱ्याच संघटना सामील झाल्या. यावेळी राजाराम तलावात पूर्वीसारखे पाणी येत नाही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याचे प्रमुख कारण म्हणजे आयआरबीने तयार केलेले रस्ते. ज्यामुळे तेथील मोऱ्या मुजल्या आहेत.यावेळी या मोऱ्या ओपन करण्याचे ठरविण्यात आले. दुसरा मुद्दा असा की,राजाराम तलाव परिसरात वस्ती वाढल्याने तलावात ड्रेनेजचे पाणी मिक्स होत आहे.ते पाणी थांबवावे अशी मागणी नागरीकांनी केली.त्यामुळे भविष्यात या सेंटरमुळे राजाराम तलावाचे पुर्नजीवन होणार आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही असेही ते म्हणाले.
संजय पवार याचं नाव न घेता टीका करताना क्षीरसागर म्हणाले की, काही लोक चूकीची माहिती नागरीकांना सांगून चुकीच्या पध्दतीने आंदोलन करत आहेत.याठिकाणी 2000 क्षमतेचे ऑडिटीरीम होणार आहे.त्याठिकाणी एक्सीबेशन सेंटर,कॉन्परन्स हॉल होणार आहे. याचा अनेकांना फायदा होणार आहे. या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा विकासाच्या प्रवाहाकडे जाणार आहे.अशा पध्दतीचं आंदोलन करणं चूकीचं आहे. राज्य शासनाला नियमात राहून एखादी वास्तू उभा करण्य़ाचा अधिकार आहे. मात्र होऊ द्यायचं नाही, होवू देणार नाही अशी भूमिका आम्ही खपवून घेणार नाही असा, इशारा राजेश क्षीरसागर यांनी दिला.