अवघ्या 13 दिवसांवर गणेशोत्सव, प्रशासन मात्र घेतेय झोपेचे सोंग : शहरवासियांतून नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
गणेशोत्सव अवघ्या 13 दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र अजूनही जिल्हा प्रशासनाने शहरातील रस्ते तसेच इतर कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे यावषीही गणरायांना खाचखळग्यातूनच यावे लागणार का? असा प्रश्न भक्तांतून उपस्थित होत आहे. वास्तविक शहरातील रस्ते दुरुस्ती, लोंबकळणाऱया विद्युततारा, अडथळा ठरणाऱया झाडांच्या फांद्या हटविणे महत्त्वाचे होते. अजूनही याबाबत पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांची बैठकच बोलाविली नाही. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते व इतर समस्या दूर होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेळगावच्या गणेशोत्सवाला मोठे महत्त्व आहे. पुणे-मुंबईनंतर बेळगावात मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव दरवषी साजरा केला जातो. घरगुती उत्सवाबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात पार पडतो. शहरामध्ये 370 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. याचबरोबर प्रत्येक घरामध्ये गणेशमूर्तींची प्रति÷ापना करून गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये भाविक मोठय़ा संख्येने सहभागी होतात. स्थानिकांबरोबरीनेच कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र आणि गोव्यातील भाविक मोठय़ा प्रमाणात उत्सव काळात बेळगावात दाखल होतात. त्यामुळे गणेशोत्सव काळात शहरातील सर्व समस्या दूर होणे गरजेचे आहे. रस्ते, गटारीवरील फरशी, डेनेजची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मात्र अद्याप कोणत्याच हालचाली सुरू नाहीत. त्यामुळे गणेशभक्तांतून नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील तसेच उपनगरांतील अनेक रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होणार आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांचा बोजवारा उडाला आहे. बेळगाव शहराच्या गल्लोगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. शहरांतर्गत मध्यवर्ती भागात तसेच शहापूर, वडगाव, अनगोळ, टिळकवाडी आदी उपनगरांतही सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम मोठी असते. या सर्व भागात किमान रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक असून स्वच्छतेकडे प्रशासनाने लक्ष देण्याची खरी गरज आहे.
सध्या तरी सर्व प्रमुख मार्ग आणि अंतर्गत गल्ल्यांमधील गटारींची स्थिती बिकट बनली आहे. गटारी तुडुंब भरलेल्या असताना त्यांच्या स्वच्छतेकडेही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. गणेशोत्सव अवघ्या 13 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आताच बैठक घेऊन अधिकाऱयांना सूचना करणे गरजेचे आहे. दरम्यान महत्त्वाचे म्हणजे गणेशोत्सव काळात विद्युतपुरवठा सुरळीत राहणे गरजेचे आहे. लोंबकळणाऱया वीजतारांची आताच दुरुस्ती झाली पाहिजे. याचबरोबर अनेक ठिकाणी उघडय़ावर फ्युज आहेत. त्यांना बॉक्स बसविणे आवश्यक आहे. गणेशोत्सवादरम्यान विद्युतपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी हेस्कॉमने दुरुस्तीचे काम हाती घेऊन गणेशोत्सवापूर्वीच विद्युतपुरवठा सुरळीत होण्याच्यादृष्टिने पाऊल उचलणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हाधिकाऱयांनी बैठक घेऊन या सूचना करणे महत्त्वाचे आहे.
शहरातील काही रस्त्यांवरून चालणेदेखील अवघड झाले आहे. तेव्हा तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा गणेशमूर्ती नेताना मोठी समस्या निर्माण होणार आहे. गणेश उत्सवादिवशी आणि अनंत चतुर्थीदिवशी भव्य मिरवणूक काढली जाते. तेव्हा तातडीने यापूर्वीच या सर्व समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.
कचऱयाची वेळेत उचल होणे गरजेचे
गणरायाच्या आगमनापासून निरोपापर्यंतच्या काळात शहरातील कचऱयाची योग्य उचल व्हायला हवी. सध्या तरी उपनगरी भागात कचऱयाची वेळेत उचल होत नसल्याचेच दिसून येत आहे. गणेशोत्सव 3 ते 4 दिवसांवर येऊन ठेपल्यावर धावपळ करण्यापेक्षा प्रशासनाने उपलब्ध कालावधीत ही कामे उरकण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ऐनवेळी सालाबादप्रमाणे उत्सवाच्या तोंडावर खोदाई आणि खड्डे बुजविण्याची मोहीम राबविली जाण्याची शक्मयता आहे. दरवषी जिल्हा प्रशासनाला उशिरानेच जाग येते. त्यामुळे भक्तांचा विचार करून तातडीने समस्या सोडविण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.