शाहूवाडी प्रतिनिधी
मलकापूर आगारात आवश्यकतेपेक्षाही कमी असणारी एसटी बसेस संख्या आणि त्यातच या आगारातील बसेसची विभागीय कार्यालयाकडे केलेली वर्गवारी प्रवाशांना चांगलीच त्रासदायक ठरत आहे .शालेय विद्यार्थ्यासह प्रवाशांना मलकापूर आगारातील कमी एसटी बसेसचा फटका बसत आहे.आगाराने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी संतप्त भावना प्रवासी वर्गातून उमटू लागली आहे.
कोल्हापूरसह कोकण याबरोबरच ग्रामीण भागात सोयीचे ठरणारे मलकापूर आगार म्हणून कार्यरत आहे.मात्र गेले काही दिवस मलकापूर आगारात कमी असणारी एसटी बस संख्या ही चांगलीच प्रकर्षाने जाणवत आहे.कोल्हापूर मलकापूर त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात वेळेत एसटी बस जात नसल्याने प्रवासी वर्गाचे मोठे हाल होत आहे.यापेक्षा शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.मुळातच शाहूवाडीतील ग्रामीण भागात वाहतुकीची साधने कमी आहेत मलकापूर पासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना याचा चांगला फटका बसत आहे .