तिसऱया-चौथ्या रेल्वेगेट दरम्यान घटना : मनपा कर्मचाऱयांनी केले अत्यंसंस्कार
प्रतिनिधी /बेळगाव
तिसऱया ते चौथ्या रेल्वेगेट दरम्यान दोन गायींना रेल्वेची धडक बसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 8 च्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर गायींच्या मालकांचा शोध घेण्यात आला. मात्र कोणीच आढळले नाही. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱयांनी त्या गायींवर अंत्यसंस्कार केले.
शहरातून रेल्वेमार्ग केल्यामुळे बऱयाचवेळा जनावरांना या रेल्वेची धडक बसून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी सकाळी दोन गायी रेल्वेरुळाजवळ चरत होत्या. यावेळी रेल्वेची धडक गायींना बसल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक उत्तम ए. गणाचारी यांना या घटनेची माहिती देण्यात आली. महापालिकेच्या कर्मचाऱयांसह ते घटनास्थळी दाखल झाले. गायी कोणाच्या आहेत, याचा शोध लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र दोन तास उलटले तरी कोणीच आले नाही. त्यामुळे उत्तम गणाचारी व त्यांच्या सहकाऱयांनी जेसीबीच्या साहाय्याने त्याच ठिकाणी खड्डे खोदून गायींवर अंत्यसंस्कार केले. हा अपघात इतका भीषण होता की, गायींची अवस्था पाहून सारेच हळहळत होते.