पेडणे / प्रतिनिधी
पेडणेतील आठवडा बाजारात काल गुरुवारी गावठी मिरची प्रती किलो एक हजार रुपये दराने विकली गेली. त्यामुळे ज्यांना ही गावठी मिरची हवी होती त्या सर्व ग्राहकांच्या नाकाला ती बरीच झोंबली. दरवषी गोव्याच्या विविध भागातून तसेच महाराष्ट्रातून आणि खानापूर, बेळगाव भागातून मिरची येते. यंदा मात्र काल पुरुमेताची तयारी करण्यासाठी तालुक्याच्या विविध भागांतून या बाजारपेठत आलेल्या ग्राहकांचे चेहरे पडल्याचे दिसून आले.
गुरुवारी या बाजारात गावठी मिरचीचे प्रमाणही कमी होते. केवळ चार ते पाच विक्रेत्यांकडेच ती उपलब्ध होती. पण तिचा एक हजार रुपये हा दर ऐकूनच तिखट लागत होती. ग्राहकांचा ती खरेदी न करण्याकडे कल दिसून आला. महाराष्ट्र, कर्नाटकातील मिरची पाचशे ते सहाशे रुपये दराने विकली गेली.
खराब हवामानाचा मिरचीला फटका
यंदा पावसामुळे तसेच वातावरणात झालेला बदल याचा परिणाम मिरची तसेच अन्य पिकांवर झाला. त्यामुळे यंदा मिरचीचे पीक सर्वत्र कमी आले. याचा परिणाम म्हणून ही मिरची सध्या 1000/- रुपये किलो दर घेऊन बसली आहे. पावसाचा गावठी कडधान्याव्ंारही परिणाम झाल्याने तीही बाजारात कमी प्रमाणात होती.
आंबा, काजू पिकांवरही परिणाम
खराब हवानामाचा परिणाम मोठय़ा प्रमाणात काजू बागायतदार असेच आंबा पिकावरही झाला. त्यामुळे दरवषी अशा प्रकारचे उत्पन्न घेणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत. बाजारात ग्राहक खूपच कमी प्रमाणात दिसून आले. गावठी भाज्यांचे दर वाढत असल्याने त्याचा परिणाम विपेत्यांवर दिसून आला. खूपच अल्प प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसाद या आठवडय़ाच्या बाजारात दिसून आला. दरवषी एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात मोठय़ा प्रमाणात मानकुराद आंबे तसेच हापूस आंबे सिंधुदुर्गातून पेडणे बाजारपेठेत दाखल होतात. यंदा मात्र एकच व्यक्ति आणि तेही कच्चे आंबे घेऊन बाजारात बसलेली दिसून आली.