अस्वच्छतेमुळे गल्लीतील गटारी कचऱयाने तुंबल्या
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील कचऱयाची उचल आणि गटारीची स्वच्छता व्यवस्थित झाली नसल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. खडक गल्ली व चव्हाट गल्ली परिसरातील गटारीची स्वच्छता केली जात नसल्याने गटारी स्वच्छता करण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. अस्वच्छतेमुळे खडक गल्लीतील गटारी कचऱयाने तुंबल्या आहेत.
शहरातील कचऱयाची उचल करण्याबाबतच्या तक्रारी नेहमीच होत असतात. तरीदेखील कचऱयाची उचल वेळेवर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कचऱयाची उचल आणि गटारींची स्वच्छता करण्यासाठी वर्षाकाठी 25 ते 30 कोटीचा निधी खर्च घातला जात आहे. तरीदेखील स्वच्छता होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहराच्या विविध भागात कचऱयाची उचल व्यवस्थित होत नाही. तसेच गटारीमध्ये साचलेला कचरा काढण्यास टाळाटाळ केली जात आहे. परिणामी सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे.
रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
काहीवेळा गटारीमधील कचरा काढून बाजूला ठेवला जातो. यामुळे गटारीमधील कचरा स्वच्छ करण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. विविध आजारांचा सामना खडक गल्ली परिसरातील रहिवाशांना करावा लागत आहे. गल्लीतील काही रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कचऱयामुळे गटारी तुंबल्याने नागरिकांना धोकादायक बनले आहे. विविध आजारांमुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. यामुळे खडक गल्ली परिसरातील स्वच्छतेचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.