बांदा/ प्रतिनिधी-
गाळेल येथे दरडीखाली गाडला गेलेला युवक नोकरीसाठी जाणारा होता कोरोनाच्या नावाखाली अडवणूक होत असल्याने हजारो युवक आडमार्गाचा वापर करतात त्यामुळे अशी दुर्घटना घडली. त्यामुळे महाराष्ट्र व गोवा सरकारने येत्या चार दिवसात याबाबत तोडगा काढावा अन्यथा 30 रोजी जिल्हा भाजपच्या वतीने गोव्यात जाणाऱ्या सर्व गाड्या अडवली जाणार असे लेखी निवेदन भाजपच्या शिष्ट मंडळाने दिला जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांना दिले.तर आपण याबाबत गोवा राज्य प्रशासनाशी बोलून चर्चा करतो असे सांगितले. तर याबाबत लवकरात लवकर तोडगा काढून गोव्याला नोकरीसाठी जाणाऱ्यांना त्यातून मुभा दयावी अन्यथा आम्ही एकही गाडी गोव्यात आणि गोव्यातून जिल्ह्यात येऊ देणार नाही असे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जिल्ह्याधिकारी यांना सांगितले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि प अध्यक्षा संजना सावंत, पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ, जि.प सदस्य श्वेता कोरगावकर, जि.प माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, बांदा सरपंच अक्रम खान, पराग गांवकर व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तेली म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सावंतवाडी, दोडामार्ग वेंगुर्ला कुडाळ तालुक्यातील 20 हजार युवक युवती रोजगारासाठी ये जा करतात. या तरुणाचे कुटुंब नोकरीवर अवलंबून आहे मात्र कोरोनाच्या नावाखाली महाराष्ट्र गोवा सीमेवर नोकरदार तरुणांची प्रत्येकवेळी अडवणूक करण्यात येत असल्याने या तरुणावर व त्यांच्यावर अंवलम्बुन कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
यावेळी अक्रम खान म्हणाले, गोवा सीमेवर प्रवेश देण्यासाठी अडवणूक होत असल्याने तरुणांना गोव्यात जाण्यासाठी अडमार्गाचा अवलंब करावा लागतोबरेच तरुण गाळेल डिंगणे मार्गाला प्राधान्य देतात गाळेल येथे दरड कोसळून त्याखाली गाडला गेलेल्या नोकरदार तरुणाचा बळी हा प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे गेला आहे. यासाठी सिंधुदुर्ग गोवा प्रशासनाने समनवय साधून यावर योग्य तो तोडगा चार दिवसात काढावा व नोकरदार तरुणांना न्याय द्यावा. याबाबत तात्काळ निर्णय न घेतल्यास सिंधुदुर्ग गोवा सीमेवर गोव्यात जाणारी अत्यावश्यक सेवेची वाहतूक रोखून धरणार यासाठी सर्वस्वी जबाबदारी हि प्रशासनाची राहील असे लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.