अन्यथा आंदोलन चालूल राहील गोंयचो एकवोटने दिला इशारा
प्रतिनिधी/ मडगाव
गोव्यातील नियोजित तीन रेषीय प्रकल्प (थ्री लीनियर प्रोजेक्ट) पर्यावरणाला बाध असल्याने हे प्रकल्प कायम स्वरूपी रद्द होत नाही तो पर्यंत या प्रकल्पाच्या विरोधातील आंदोनल सुरूच राहणार असल्याचा इशारा ‘गोंयचो एकवोट’ संघटनेने मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला स्थानिक जनतेने तीव्र विरोध केला होता. तरी सुद्धा दुपदरीकरणाचे काम पुढे नेण्यासाठी सरकारची तयारी होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील जनतेला न्याय देताना, रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला दणका दिला. आत्ता राज्य सरकारने केंद्र सरकावर दबाव आणून थ्री लीनियर प्रोजेक्ट रद्द बातल करावेत अशी मागणी गोंयचो एकवोट संघटनेने केली आहे. जर हे प्रकल्प रद्द झाले नाही तर त्यासाठी पुन्हा रस्त्यावर यावे लागेल असे संघटनेचे निमंत्रक कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रेल्वे मार्ग दुपदरीकरण, तन्?मार वीज प्रकल्प व राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण हे तिन्ही प्रकल्प कोळसा वाहतुकीसाठी आहेत. तसेच ते पर्यावरणदृष्टीने हिताचे नाहीत. त्यामुळे गोंयचो एकवोट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्?वागत करते. कोरोनाचा काळ सुरु असताना सरकारने षडयंत्र रचून पडद्यामागून या प्रकल्पांचे काम सुरू केले होते. गोव्याची जनता कोरोनाच्या भीतीने घरात असताना या प्रकल्पांना चालना देण्यात आली. यादरम्यान गोव्यातील काही संघटनांनी संघटित होऊन आंदोलनेही केली. शेवटी न्यायालयात धाव घ्यावी लागली. यापुढेही आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला संघटनेचे ऑलेन्सियो सिमॉईश, शंकर पोळजी, एला मास्कारेन्हस व इतर सदस्य उपस्थित होते.