प्रतिनिधी / बेळगाव
प्राणी व पशु-पक्ष्यांवर अंत्यक्रिया करण्यासाठी बेळगाव शहराजवळ जागा उपलब्ध करून देण्याची मागणी लोकसेवा फौंडेशनने जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ, आनंद भातकांडे, राम निलजकर, यल्लोजी पाटील, महेश रेड्डी, बसय्या हिरेमठ, सुभाष पाटील, लिंगय्या बुर्लकट्टी आदींनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन निवेदन दिले असून तातडीने स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. प्राणी, पशुपक्ष्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह एखाद्या गटारीत, कचराकुंडीत, रस्त्याशेजारी फेकले जातात. वाढत्या शहरीकरणामुळे प्राण्यांच्या मृतदेहावर अंत्यक्रिया करण्यासाठी योग्य जागाही मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.