आनेवाडी, तासवडे टोलनाक्यावर वाहतुकीची कोंडी, चाकरमान्यांची पुणे, मुंबईकडे जाण्यासाठी धडपड
प्रतिनिधी/ सातारा
दिवाळीचे चार दिवस सण साजरा करुन परतीच्या मार्गावर चाकरमान्यांनी रविवारी दिवसभर मुब्ंाई, पुण्याच्या दिशेने वाट धरली आहे. त्यात मुंबई, पुण्यामध्ये एसटीचा संप असल्याने खाजगी वाहनाने आपल्या नोकरीच्या ठिकाणी हजर राहण्यासाठी रविवारी प्रयत्न दिसत होता. त्यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जिह्यातील तासवडे आणि आनेवाडी या दोन्ही टोलनाक्यावर पुण्याकडे जाणाऱया लेनवर लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र रविवारी दिवसभर पहायला मिळत होते. दरम्यान, झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रकार घडत होते.
सातारा जिह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात पुणे, मुंबईमध्ये असलेले चाकरमान्या मंडळी दिवाळीच्या सणाला आले होते. दिवाळीचा चार दिवस सण उत्साहात साजरा करुन पुन्हा परतीच्या मार्गावर रविवारी निघाले. त्यामुळे सकाळपासून पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील तासवडे आणि जावली तालुक्यातील आनेवाडी या टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. यामुळे वाहनांची कोंडी होत होती. वाहतूक कोंडीत वाहने अडकल्याने वादावादीचे प्रकार घडत होते. त्यातच एसटीचा संप असल्याने खाजगी वाहनामधून हा प्रवास सुरु असल्याने खाजगी वाहनांची रस्त्यावर गर्दी पहायला मिळत होती. आनेवाडी टोलनाक्यावर आनेवाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलीस मात्र कुठे दिसत नव्हते. एसटीच्या संपाच्या बातम्या ऐकून व मुंबई, पुण्यासाठी जाण्याकरता एसटीचे केलेले बुकींग रद्द करण्याचे वेळ काही प्रवाशांवर आली तर खाजगी बसेसमधून मिळेल ते तिकीट काढून मुंबई, पुण्याकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गडबड रविवारी पहायला मिळत होती.
रुग्णवाहिकेतून मुंबईकडे प्रवास
मुंबईमध्ये एसटीचा संप असल्याने व एसटी मिळणार नाही हे गृहीत धरुन काही प्रवाशी चक्क रुग्णवाहिकेतून मुंबई, पुण्याकडे मिळेल तो तिकीटचा दर देवून प्रवास करताना अनेकांनी सांगितले. त्यामुळे प्रवास कशापद्धतीने सुरु आहे याचे चित्र पहायला मिळत आहे.