- 63,309 नवे रुग्ण, 6,73,481 जणांवर उपचार सुरु
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात काल पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. राज्यातील दैनंदिन आकडे आणि मृत्यूंची वाढती संख्या धडकी भरवणारे ठरले आहेत. दरम्यान, मागील 24 तासात राज्यात कोरोनामुळे 985 जणांनी आपला जीव गमावला आहे. एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे. तर आतापर्यंत 67,214 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवशी 63 हजार 309 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 61 हजार 181 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास राज्यातील स्थिती अधिकच भीषण बनत चालल्याचे दिसत आहे. राज्यातील बाधितांची एकूण संख्या 44 लाख 73 हजार 394 वर पोहोचली आहे. त्यातील 37,30, 729 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.4 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.5 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 73 हजार 481 रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 कोटी 65 लाख 27 हजार 862 नमुन्यांपैकी 16.86 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 42 लाख 03 हजार 547 क्वारंटाईनमध्ये असून, 31 हजार 159 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.