ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
शिक्षण क्षेत्रासाठी लवकरच नवे शिक्षण धोरण घोषिक करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली.
त्या म्हणाल्या, रोजगार देण्याऱया शिक्षणावर भर दिला जाणार. उच्च शिक्षणासाठी सरकारचे विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. डिप्लोमासाठी 2021 पर्यंत नव्या संस्था उभारण्यात येतील.
तरुण पिढी उद्योजकाकडे वाटचाल करत आहे. त्यांची क्षमता आम्ही ओळखली आहे. त्यामुळे अजून मोठय़ा संधी दिल्या जाणार आहेत. स्किल इंडियासाठी 3 हजार कोटींची तरतूद केली जाईल.
शिक्षणासाठी 99 हजार 300 कोटींची तरतूद केली जाणार आहे. शिक्षण क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे. स्कील डेव्हलपमेंटवर 3 हजार कोटी खर्च करणार असल्याचंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.
शेतकरी महिलांसाठी विशेष योजना सुरु केल्या जातील.