वायू प्रदूषणामुळे भारताच्या व्यापाराचे प्रतिवर्ष 7 लाख कोटी रुपयांचे नुकसान होते, असे अनुमान एका सर्वेक्षण संस्थेने काढले आहे. डलबर्ग असे या संस्थेचे नाव असून ती जगातील विविध देशांमधील वायू प्रदूषणाचा स्तर आणि त्यामुळे होणारा अर्थव्यवस्थेवरील परिणाम यांचा अभ्यास करते.
भारतातील वायू प्रदूषणाची पातळी जगातील प्रगत देशांच्या तुलनेत बरीच जास्त आहे. याचा विपरित परिणाम मोठय़ा प्रमाणात भारतीय उद्योग क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्राला बसतो. वायू प्रदूषणामुळे या क्षेत्रांमध्ये काम करणाऱया कामगारांना सातत्याने प्रकृतीच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे हे कामगार प्रतिवर्ष 130 कोटी कार्यदिवस इतकी सुट्टी घेतात. परिणामी उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादनाचा दर्जा व प्रमाण दोन्ही खालावते. हा फटका लाखो कोटी रुपयांचा आहे.
वायू प्रदूषणामुळे होणारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नुकसान भारताच्या एकंदर स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3 टक्के आहे. भारत सरकार आपल्या अर्थसंकल्पातून प्रतिवर्ष आरोग्यासाठी जितकी रक्कम खर्च करते, त्याच्या दुप्पट हे प्रमाण आहे. वायू प्रदूषण नियंत्रणात आणल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेत प्रतिवर्ष साधारणतः 10 लाख कोटी रुपयांची भर पडण्याची शक्मयता या संस्थेने व्यक्त केली आहे.
वायू प्रदूषणाचे जसे शारीरिक परिणाम होतात, तसे मानसिक परिणामही घातक आहेत. प्रदूषित वायूंचे प्रमाण वाढल्यास माणसाचा उत्साह कमी होतो. तो शारीरिक व मानसिकदृष्टय़ा मरगळलेल्या अवस्थेत जातो. अशी व्यक्ती कामावर आली तरी पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. वायू प्रदूषणामुळे थकवा अधिक प्रमाणात जाणवतो. त्यामुळे सलग काम करणे अशक्मय बनते. इत्यादी निरीक्षणे अनेक तज्ञांनी नोंद केलेली आहेत. त्यामुळे भारताने वायू प्रदूषण 25 टक्के कमी केले तरीही त्याला आर्थिकदृष्टय़ा उभारी येण्यास साहाय्य होईल, असे ही संस्था मानते.
2019 मध्ये भारतात 17 लाख लोकांचा मृत्यू वायू प्रदूषणामुळे झाला, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अनेकांचे आयुष्यही या प्रदूषणामुळे कमी झाले. तरुणवयात अकाली मृत्यू येण्याचे प्रमाण वायू प्रदूषित शहरांमध्ये अधिक आहे. या साऱयांचा विचार करून भारत सरकारने धोरणे ठरवावीत, असे मत आहे.