समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळालेच पाहिजे यासाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची संकल्पना निर्माण झाली. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी म्हणून शाळा स्थापन करण्यात आल्या. विद्यार्थी संख्या आणि अंतराची मर्यादा या बाबी विचारात घेऊन सरकारी शाळांची स्थापना करण्यात आली. 19 व्या शतकात सुरु झालेला शिक्षणाचा प्रसार विसाव्या शतकात विस्तारला. अनेक खासगी शाळा स्थापन होत असतानाच शिक्षणाची गरज ओळखून शाहूनगर येथे शाळा स्थापन करण्यात आली.
शाहूनगर येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी या उद्द्sशाने 2000-2001 साली सरकारी कनि÷ प्राथमिक मराठी शाळेची स्थापना करण्यात आली. माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर यांच्या दुकानवजा छोटय़ाशा वर्गखोलीत शाळेचा श्रीगणेशा करण्यात आली. आठ पटसंख्येवर शाळा सुरु करण्यात आली. पुढे शंकुतला शिवरुदाप्पा (हुगार) व एच.एच.कदम या शिक्षकांच्या प्रयत्नातून माजी नगरसेवक व वंदना बेळगुंदकर यांच्या सहकार्याने शाळा व्यवस्थापकीय दृष्टय़ा सुरळीतपणे सुरु झाली. तीन वर्षे याच दुकानातच शाळा चालविली गेली.
पुढे शिक्षकांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि शाळेची वाढती पटसंख्या विचारात घेऊन शाळेची इमारत बांधण्यात आली. सुट्टीच्या कालावधीत शिक्षण खाते व मनपाकडे पाठपुरावा करुन बेळगुंदकर यांनी 2004 या शैक्षणिक वर्षात शाळेचे उद्घाटन करुन इमारत शाळेला हस्तांतरीत केली. यामुळे पुढे शाळेची प्रगती होत गेली. 2006-2007 या शैक्षणिक वर्षात 100 पर्यंत पटसंख्येचा टप्पा गाठत एच.एच. कदम, लंगरकांडे, बी. बी. पाटील, शकुंतला शिवरुद्राप्पा हे चार शिक्षक शाळेत कार्यरत होते.
सहकार्यातून शाळेचा विकास
शिक्षकांचे प्रयत्न तसेच एस. डी. एम. सी.ची साथ यामुळे शाळेचा विकास होत गेला. सध्या शाळेत दोन शिक्षक असून प्रभारी मुख्याध्यापक उज्ज्वला गोडबोले तर कन्नड शिक्षिका म्हणून शकुंतला शिवरुद्राप्पा कार्यरत आहे. सध्या शाळेत एस.डी.एम.सी अध्यक्षा वर्षा यादव तर उपाध्यक्षा लक्ष्मी भोसले आहेत.पालक वर्ग देखील मदतीच्या भावनेतून शाळेला भेटी देत असतात. यामुळे सध्याच्या इंग्रजीच्या युगात देखील शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या शाळेत शाहूनगर, सदाशिवनगर, कंग्राळी, मार्केटयार्ड या भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत.
प्रसन्न वातावरण
अनेक सरकारी शाळांची अवस्था केवळ सिमेंटच्या जंगलासारखी झाली आहे. मात्र शाहूनगर येथील शाळेच्या अवतीभोवती असणारे निसर्गरम्य वातावरण शाळेसाठी लाभदायक आहे. शिक्षकांनी पुढाकार घेऊन शाळेच्या आवारात विविध झाडे लावली आहेत. यामुळे शाळा निसर्गाच्या कुशीत वसल्यासारखी वाटते. शाळेच्या आवारातच कन्नड शाळा आहे. शाळेला हक्काची इमारत मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. यामुळे शाळेला स्वतःची इमारत मिळाली. शाळेचा परिसर 5 गुंठय़ाचा आहे. शाळेत 3 वर्गखोल्या, 1 स्वयंपाक खोली तसेच मैदान व हिरवेगार वृक्ष आहेत.
द्विदशक पार
शाळा स्थापन होऊन 20 वर्षे झाली. 2020 ला शाळेने द्विदशक पार केले आहे. शाळेच्या प्रगतीत आलेल्या चढउताराने सामोरे जात शाळेने आतापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. सध्या शाळेत कार्यरत मराठी व एक कन्नड शिक्षिका यांच्याकडून उपक्रमशील शिक्षण दिले जात आहेत. माध्यान्ह आहार तसेच इतर शासनाच्या योजना तसेच पालकांकडून मिळणारे सहकार्य यांच्या माध्यमातून अधिकाधिक सुविधा पुरविल्या जात आहेत. शाळेच्या स्वच्छतेचा भार रेणुका तल्लूर यांनी घेतला असून 8 वर्षापासून शाळा स्वच्छ करणे तसेच शाळेत व्यवस्था ठेवण्याचे कार्य त्या करत आहेत.
उज्ज्वला गोडबोले (प्रभारी मुख्याध्यापिका)
2007 सालापासून या शाळेत त्या कार्यरत आहेत. शाळा छोटी आहे मात्र शाळेची प्रगती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काळाच्या ओघात पटसंख्या कमी होत गेली. मात्र सर्व सोयीसुविधा पुरविण्याकडे आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
राधिका सांबरेकर