तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांची माहिती
कणकवली:
तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे 251 रुग्ण आढळले असून त्यातील 72 सक्रिय आहेत. हरकुळ बुद्रुक येथील कोविड सेंटरवर आतापर्यंत 77 रुग्ण दाखल झाले असून सध्या 32 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात 24 सक्रिय कंटेनमेंट झोन असून खारेपाटण, नांदगाव प्राथमिक आरोग्य पेंद्रांतर्गत रुग्णसंख्या सध्या जास्त आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत आणखी एक कोविड सेंटर लवकरच सुरू होत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी दिली.
कणकवली पं. स.ची मासिक बैठक पं. स.च्या सभागृहात सभापती दिलीप तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला उपसभापती दिव्या पेडणेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी वैभव सापळे आदींसह पं. स. सदस्य, विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कासार्डे येथे जे कोरोनाचे रुग्ण मिळाले, ते भाजी व्यावसायिक असून बेळगाव येथून आले होते. वास्तविक जिल्हय़ाच्या सीमा ‘लॉकडाऊन’ असतानाही ते बेळगाव येथे कसे गेले, असा सवाल सदस्य प्रकाश पारकर यांनी केला. त्यावर, ई-पास देण्याचे काम प्रशासन करत असल्याचे भोसले म्हणाले. पण, अत्यावश्यक सेवेतील गाडय़ांना जिल्हय़ाबाहेरील प्रवासाचा कायमस्वरुपी पास आहे. त्याच गाडय़ांमधून अनेकजण जिल्हय़ाबाहेर जात असल्याचे सदस्य मनोज रावराणे यांनी निदर्शनास आणताना इमर्जन्सी सेवेंतर्गत जिल्हय़ाबाहेर जात असलेल्यांचीही रॅपीड टेस्ट करावी, अशी सूचना त्यांनी केली.
उपजिल्हा रुग्णालय येथील ब्लड स्टोअरेज युनिट येथे रक्त उपलब्ध नसल्याबाबत मिलिंद मेस्त्राr यांनी विचारले असता, आम्ही गरजेप्रमाणे ओरोस येथील रक्तपेढीकडे मागणी करतो. तेथे साठा उपलब्ध असल्यास आम्हाला पुरवठा होतो, असे डॉ. टाक यांनी सांगितले. मात्र, सध्या कोरोनामुळे वाहतूकही बंद असल्याने सर्वसामान्यांची धावपळ होते. म्हणूनच उपजिल्हा रुग्णालयात जास्तीत जास्त रक्तसाठा उपलब्ध ठेवा, अशा सूचना सभापती तळेकर यांनी दिल्या. लॉकडाऊनमुळे एसटीच्या फेऱया बंद झाल्याचा प्रवासी, ग्रामस्थांना फटका बसत असल्याने एसटी फेऱया सुरू करण्याची सूचना भाग्यलक्ष्मी साटम यांनी केली. त्यावर सध्या बऱयाच फेऱया सुरू झाल्याचे एसटीच्या अधिकाऱयांनी सांगितले.
देवगड-निपाणी रस्ता कामाबाबत स्थानिकांच्या तक्रारी असल्याने या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी सुजाता हळदिवे यांनी केली. तळेरे – वैभववाडी रस्ता, कासार्डे गडमठमार्गे फोंडा या रस्त्यांचाही प्रश्न साटम, पारकर यांनी उपस्थित केला. फोंडा – वैभववाडी रस्त्यासाठी 72 लाखांचा खर्च आहे. पण, कामाचा दर्जा पाहता, हा खर्च फक्त कागदावरच केल्याचे दिसत असून याबाबत ठेकेदाराची चौकशी व्हावी, अशी मागणी रावराणे यांनी केली. गणेश तांबे यांनी, गेल्या दोन वर्षांत मंजूर झालेल्या रस्ता दुरुस्ती कामाचा अहवाल मिळावा, अशी सूचना केली.
फोंडाघाट परिसरातील विस्कळीत विजेबाबत सुजाता हळदिवे यांनी लक्ष वेधले. कोरोनामुळे चाकरमानी रोजगार गमवून गावी आलेले असतानाच भरमसाठ प्रमाणात आलेले बिल सर्वांसाठी डोकेदुखी ठरले आहे. हे वीजबिल किमान 50 टक्के कमी करावे, अशी मागणी प्रकाश पारकर यांनी केली. तसेच गणेशोत्सव काळात किमान दहाजणांच्या ग्रुपला गावात अथवा वाडीत भजन करण्याची परवानगी मिळावी, अशीही सूचना त्यांनी केली. दहावी, बारावीत तालुक्यात प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
‘नाणार’ला तेव्हा विरोध, आता पाठिंबा
कोरोनामुळे बहुतांश चाकरमानी गावी आले असल्याने जिल्हय़ात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. नाणार येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्प झाल्यास जवळपास दिड लाख जणांना रोजगार मिळणार असल्याने प्रकल्पाच्या समर्थनार्थ ठराव घेण्याची सूचना रावराणे यांनी केली. मात्र, दोन वर्षांपूर्वी याच पंचायत समितीने प्रकल्पाला विरोध केल्याचे सदस्य मंगेश सावंत यांनी निदर्शनास आणले. पण, त्यावेळी लोकांमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र, आता देवगडसारख्या अनेक ठिकाणांहून प्रकल्पाला पाठिंबा मिळत असल्याचे रावराणे म्हणाले.