गेले वर्षभर भारताला छळत असलेल्या कोरोना व्याधीला नियंत्रणाखाली आणण्यासाठी आता अनेक राज्यांमध्ये दुसरा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे एरव्ही कामासाठी दिवसभर बाहेर असणाऱया लोकांवर अनिवार्यपणे घरात बसण्याची वेळ आली. परिणामी मद्यप्राशनाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. एकीकडे पुढे काय होणार? याची चिंता तर दुसरीकडे हाती असलेला भरपूर रिकामा वेळ, याचा परिणाम म्हणून पिण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. हे प्रमाण इतके वाढले आहे, की गेल्या वर्षभरात सर्वाधिक मद्याचा खप भारतात झाल्याचा निष्कर्ष ‘युगोव्ह’ या संस्थेने सर्वेक्षणाअंती काढला आहे.
सर्वसाधारणपणे देशात मद्याचा खप प्रतिवषी साडेपाच ते सहा टक्क्मयाने वाढतो. कोरोना वर्षात मात्र तो 25 टक्क्मयांनी वाढल्याचे दिसून आले आहे. अनेक जण चिंतेपासून दूर होण्यासाठी मद्यप्राशनाला जवळ करतात. तर इतर अनेक जण त्यांची नेहमीची सवय म्हणून मद्यप्राशन करतात. डॉक्टरांनी अशा मद्यपींना सावधानतेचा इशारा दिला असून प्रकृतीवर वाईट परिणाम होणार नाही इतपतच मद्यप्राशन करण्याचा सल्ला दिला आहे.
अतिरिक्त मद्यपान प्रकृतीला घातक असते, यात शंका नाही. पण या वाढत्या मद्यपानाची दुसरी बाजू अशी आहे, की पौष्टिक जीवनसत्वयुक्त आणि प्रथिनेयुक्त आहाराच्या प्रमाणातही बरीच वाढ दिसून येत आहे. बहुतेक लोकांनी आता जंक फूड किंवा चमचमीत तयार अन्न टाळले असून ते फळे, पालेभाज्या, सुकामेवा, तंतूयुक्त आहार आणि फळभाज्या यांच्यावर भर देत आहेत. ही सवय चांगली असून ती कोरोनानंतरच्या काळातही लोकांनी कायम ठेवली पाहिजे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मद्यपान मात्र पूर्णतः टाळल्यास उत्तम, असेही त्यांचे म्हणणे आहे.