सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर केली होती तीव्र नाराजी
प्रतिनिधी / सातारा
ज्या चीनमध्ये जगावर कोरोनाचे संकट आले. ज्या चीनशी भारताचे सैन्य दोन हात सीमेवर करत आहे. त्याच चीनच्या नावाने साताऱयात हॉटेल होत असल्याचा बॅनर राजवाडा परिसरात काल लागला होता. देशप्रेमी नेटकऱयांनी त्यावर टीकेची झोड उठवताच हॉटेलच्या मालकांनी हॉटेलचे नाव नुसतेच टाऊन ठेवले आहे. त्यामुळे चुकीच्या प्रकारावर लगेच सातारकर प्रकाशझोत टाकत असल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आले.
साताऱयात चायना टाऊन नावाने हॉटेल शशिन मोहिले आणि चंद्रशेखर घोडके यांनी सुरु करण्याकरीता उद्घाटनसोहळय़ानिमित्ताने बोर्ड लागला. त्या बोर्डवर चायना नाव हे साताऱयातील देशप्रेमी नेटकऱयांना चांगलेच खटकले. दिवसभरात सामाजिक कार्यकर्ते गणेश दुबळे आणि राजू गोडसे यांनी तो बोर्ड व्हायरल करुन टीका केली होती. त्यामुळे हॉटेलचे मालक शशिन मोहिले आणि चंद्रशेखर घोडके यांनी देशप्रेम प्रथम म्हणून हॉटेलचे नाव चायना टाऊन हे काढून नुसतेच टाऊन हे ठेवले आहे. त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश दुबळे म्हणाले, अखेर देशप्रेमाची लढाई जिंकली आहे. सोशल मीडियावर चालवलेल्या चळवळीला यश आले आहे, असे त्यांनी सांगितले. राजू गोडसे यांनीही घोडके यांनी नाव बदलण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे स्वागत आहे, असे त्यांनी सांगितले.