दिवसभरात 1.14 लाख बाधित – गेल्या दोन महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. देशात कोरोना वाढीचा वेग मंदावला आहे. तर कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडणाऱया रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी गेल्या दोन महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. देशात दिवसभरात 1 लाख 14 हजार 460 कोरोना रुग्णांची भर पडली असून 2 हजार 677 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान एका दिवसात देशातील 1.89 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात सलग चोविसाव्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारपर्यंत देशात लसींचे 23 कोटी 13 लाख 22 हजार डोस देण्यात आले आहेत. शनिवारी एकाच दिवसात 33.53 लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा 1.20 टक्के इतका आहे तर रिकव्हरी दर हा 93 टक्के आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे.
गेल्या 24 तासात देशात 1 लाख 14 हजार 460 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 1 लाख 89 हजार 232 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्यामुळे दिलादायक वातावरण आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 88 लाख 09 हजार 339 इतकी आहे. यापैकी आतापर्यंत 3 लाख 46 हजार 759 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत 2 कोटी 69 लाख 84 हजार 781 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता अजूनही देशात 14 लाख 77 हजार 799 इतके सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी सक्रिय रुग्णांची आकडेवारी 77 हजार 449 ने घटली आहे.
देशात एकीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढविले असताना दुसरीकडे साप्ताहिक पातळीवर पॉझिटिव्हीटी दरातील (बाधित असणाऱया रुग्णसंख्येतील) घसरण सुरू असल्याचे दिसत आहे. साप्ताहित पातळीवरील पॉझिटिव्हीटी दर सध्या 6.54 टक्के इतका आहे तर, दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 5.62 टक्के इतका आहे. हा दर सलग तेराव्या दिवशी 10 टक्क्मयांपेक्षा कमी राहिला आहे.