प्रतिनिधी /पणजी :
राज्याला गुरुवारी धुंवाधार पावसाने झोडपून काढले. अनेक नद्यांना पूर आला व सायंकाळी पाणी आसरले. पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दुपारनंतर थोडी उसंत घेतली. तोपर्यंत सांखळी, डिचोली, होंडा तसेच राज्यातील अनेक नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडून आतील पाणी पात्राबाहेर पडले होते. पणजीत 18 जून, आत्माराम रस्ता तसेच मळा भागातील काही रस्तेही पाण्याखाली गेले होते.
राज्यातील मुसळधार पावसाने गुरुवारी परिस्थिती गंभीर झाली. पहाटेपासूनच राज्याला पावसाने झोडपायला सुरुवात केली. दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत होता.
धुंवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
हरवळेच्या धबधब्याने आक्राळ विक्राळ स्वरुप धारण केले होते. नियमित कोसळणाऱया धबधब्याने आपला मार्गही बदलला. होंडातील रस्ते पाण्याखाली गेले. सत्तरी, सांगे, फोंडा तालुक्यातील अनेक ओढे व नाले धोक्याची पातळी ओलांडून अनेक भागात पुराचे पाणी घुसले. मात्र दुपारी पावसाचा जोर कमी झाला आणि पुराचा प्रवाहही कमी झाला. दिवसभर मात्र पावसाची संततधार चालूच राहिली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
आगामी चार दिवस राज्यात मुसळधार
गेल्या 24 तासात पेडणे मध्ये दीड इंच, फोंडा 2 से. मी. पणजी, जुने गोवे, सांखळी प्रत्येकी 2 इंच, काणकोण व सांगे प्रत्येकी दीड इंच, केपे 1 इंच, दाबोळी 1 इंच एवढी पावसाची नोंद झाली. पेडणेत आतापर्यंत 72 इंच पाऊस झालेला आहे. सांखळीत 70 इंच पावसाची नोंद झाली. पणजीत सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 वा. यादरम्यान पडलेला पाऊस अडीच इंच होता. त्यामुळे पणजीत आतापर्यंत पडलेला पाऊस 62 इंच झालेला आहे. सरासरीच्या तुलनेत तो 15 इंचांनी झास्त पडलेला आहे. दरम्यान आगामी चार दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज पणजी वेधशाळेने व्यक्त केला आहे.
शापोरा, तेरेखोल नदीच्या पाण्यात वाढ
तिळारी धरणाचे अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे शापोरा आणि तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने किनारी भागातील शेतीत, बागायतीत पाणी शिरल्याने शेतीची काही प्रमाणात नुकसानी झाल्याचे वृत्त आहे.
सत्तरी तालुक्यातही जनजीवन विस्कळीत
सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये पडत असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गुरुवारी सकाळपासून मोठय़ा प्रमाणात पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या 24 तासांत सत्तरी तालुक्मयात जवळपास साडेपाच इंच पावसाची नोंद झाली असून आतापर्यंतचा पाऊस 50 इंच झाला आहे.
कवळेत चार कुत्र्यांचा शॉक लागून मृत्यू
फोंडा तालुक्यातील विविध भागात काही प्रमाणात पडझड झाली. बंदर बांदोडा येथे एका घरावर झाड कोसळले. तर कपिलेश्वरी व शापूर येथे रस्त्यावर झाडाच्या फांद्या कोसळल्याने वाहतूक खोळंबली. उसगाव येथे एका घरात पाणी शिरले. कवळे येथे विजेची जिवंत तार तुटून पडल्याने चार कुत्र्यांचा शॉक लागून मृत्यू झाला.
साखळीत वाळवंटीला पाणी वाढले
सांखळी मतदारसंघात गुरुवारी सकाळपासून दिवसभर पावसाने झोडपले. मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. सांखळी पालिका मैदान पाण्याखाली गेले होते. ग्रामीण भागातही किरकोळ समस्या निर्माण झाल्याची माहिती उपलब्ध झाली. वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढलेली पाहायला मिळाली. सांखळी बाजारात पंप लावून पाणी बाहेर फेकण्यात आले. तरीही सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती संबंधित अधिकाऱयांनी दिली.