प्रतिनिधी/ बेळगाव
विविध पिकांसाठी सरकारने फसल विमा योजना लागू केली आहे. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे बऱयाच वेळा शेतकऱयांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे विमा भरणे गरजेचे आहे. याची जनजागृती करण्यासाठी कृषी विभागातर्फे विविध तालुक्मयांमध्ये मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या मोहिमेचे उद्घाटन बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते ध्वज दाखवून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी झिलाणी मोकाशी यांनी कृषी संदर्भातील पत्रकाचे अनावरण केले. शेतकऱयांनी या फसल विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱयांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल होत चालला आहे.
शेतकऱयांसाठी ही योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. पंतप्रधान फसल विमा योजना गेल्या काही वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अति पावसामुळे किंवा दुष्काळामुळे तसेच इतर नैसर्गिक हानीमुळे पिकांचे नुकसान झाले तर विमा मिळतो. त्यासाठी अत्यंत कमी रक्कम शेतकऱयाला भरावी लागते. इतर अधिक विम्याची रक्कम सरकार भरते. तेव्हा त्याचा लाभ शेतकऱयांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी बेळगाव विभाग कृषी अधिकारी कोळेकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.