बांके बिहारीमध्ये उधळला गुलाल, मागील वर्षापेक्षा दुप्पट लोकांची हजेरी
वसंत पंचमीदिनी मंगळवारी वृंदावनमध्ये 40 दिवसीय होळी उत्सव सुरू झाला आहे. बांके बिहारी मंदिरात जोरदार गुलाल उधळला गेला आहे. कोरोनानंतर वृंदावनचा हा पहिला उत्सव आहे, तर भाविकांची संख्या मागील वसंत पंचमीपेक्षा अधिक दिसून येत आहे. मागील वर्षी होळीर्पी देशात कोरोनाचा शिरकाव झाला होता. तेव्हा ब्रजमध्ये होळी साधारण स्वरुपात साजरी करण्यात आली होती.
मागील वर्षी होळीदरम्यान ब्रजमध्ये 10 लाखाहून अधिक भाविक आले होते. तर वसंत पंचमीच्या दिनी वृंदावनात 30-40 हजार भाविक होते. यंदा हा आकडा 80 हजार ते 1 लाखापर्यंत पोहोचला आहे. पुन्हा एकदा संपूर्ण ब्रज क्षेत्रात (मथुऱयापासून गोकुळ, नंदगाव ते बरसाना आणि गोवर्धनपर्यंत) उल्हास आहे. मंगळवारपासून वृंदावनमध्ये हरिद्वार कुंभ पूर्व वैष्णव बैठक म्हणजेच लघु कुंभ सुरू झाला आहे. वृंदावनातील यमुना काठावर 8 किलोमीटर क्षेत्रात कुंभनगर वसविण्यात आले आहे.
पहिले शाही स्नान माघी पेर्णिमेला (27 फेब्रुवारी) आहे. यात वैष्णवांचे चारही संप्रदाय आणि तीन वैरागी आखाडे सामील होत आहेत. यमुना एक्स्प्रेस-वे आणि दिल्ली-आगरा महामार्गापासून वृंदावनच्या दिशेने येणाऱया रस्त्यांवर मोठी गर्दी आहे. सुमारे वर्षभरानंतर वृंदावनच्या धर्मशाळा, अतिथीगृहे आणि हॉटेल्समध्ये आता गजबजाट दिसून येत आहे.