एम. के गावडे यांचा सवाल : शिक्षकांना न्याय मिळावा!
वार्ताहर / वेंगुर्ले:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार हे राज्य शासनाच्याच मार्गदर्शक तत्वानुसार देण्यात येतात. मात्र, 2020 चे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द करण्याचे कारण काय? याची प्रशासनामार्फत योग्य ती चौकशी होऊन शिक्षकांवर होणारा अन्याय त्वरित थांबविण्यात यावा व जिल्हय़ातील शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकेतस्थळावर पाठविण्यात आल्या आहेत.
गावडे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, 2000 पासून शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे सिंधुदुर्ग जि. प. आदर्श पुरस्कार देत आहे. मात्र, 2020 मधील नावे जाहीर करण्याऐवजी आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द केल्याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली. याबाबत जिल्हय़ातील शिक्षक वर्गात कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक तालुक्मयातून शिक्षण क्षेत्रात चांगले कार्य करणाऱया शिक्षकांमधून हे प्रस्ताव मागविले जातात. गटशिक्षणाधिकारी आवश्यक मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करून जि. प. कडे प्रस्ताव पाठवितात. याही वषी सदर प्रक्रिया शिक्षण विभागातर्फे पूर्ण झाली असून फक्त पुरस्कार जाहीर होण्याची प्रक्रिया बाकी होती. असे असताना वृत्तपत्रातून आदर्श शिक्षक पुरस्कारच रद्द झाल्याची बातमी येते. ही घटना जिल्हय़ाला भूषणावह नाही.
सिंधुदुर्ग जिल्हय़ाला शैक्षणिक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात वेगळी परंपरा लाभली असून आज देशात योजनांची नावे मोठमोठी ठेवली जातात. मात्र, ना शेतकऱयांचा सन्मान होतो. आता तर शिक्षकांचाही होणारा सन्मान थांबवून काही लोक वेगळीच परंपरा सुरू करण्याच्या मनस्थितीत दिसत आहेत. समाजातील जो घटक आदर्श समाज, आदर्श पिढी निर्माण करतो त्या शिक्षकांचाच अपमान होत आहे, हे योग्य नाही. यामुळे याचा विचार करून शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी गावडे यांनी केली आहे. :