विधानपरिषदेत विरोधी पक्षातील सदस्यांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
अवकाळी पावसाने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तेव्हा शेतकऱयांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी जोरदार मागणी विधानपरिषद सदस्यांनी विधानपरिषदमध्ये केली. यावर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी यापूर्वी कर्जमाफी केलेली आहे. काही शेतकऱयांची कर्जमाफी करणे बाकी आहे. त्यांची कर्जमाफी करण्याबाबत आमचा विचार सुरू आहे. मात्र सध्या आर्थिक परिस्थिती कठीण असल्यामुळे सरसकट कर्जमाफी करणे अशक्मय असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
कोरोनानंतर पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे शेतकऱयाला जीवन जगणे कठीण बनले आहे. शेतकऱयांनी काढलेले कर्ज भरणेदेखील अवघड झाले आहे. भात, सोयाबिन, मिरची, मक्का, कापूस, तंबाखू या पिकांचे नुकसान झाले आहे. तेव्हा त्याचा सर्व्हे होणे महत्त्वाचे आहे. शेतकरी हा आर्थिक अडचणीत आला आहे. तेव्हा सरकारने योग्य पाऊल उचलावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अंदाजपत्रकाची मांडणी करताना विरोधी पक्षातील सदस्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे. यावर सभागृहात जोरदार चर्चा झाली. काही शेतकऱयांना कर्जमाफी मिळाली नाही. त्याबाबत तक्रारी आल्या आहेत. त्याचा विचारविनिमय सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. यावर विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी केंद्र सरकारकडे तुम्ही पाठपुरावा करा.
राज्यातून जीएसटी तसेच इतर कर मोठय़ा प्रमाणात केंद्र सरकारला मिळत आहे. त्यामधील रक्कम राज्य सरकारला दिल्यास शेतकऱयांचे कर्ज माफ होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यावर केंद्र सरकारने नियमानुसार जो निधी दिला पाहिजे तो आम्हाला मिळत आहे. मात्र अतिरिक्त निधी मिळणे कठीण आहे, असे सांगत बसवराज बोम्माई यांनी यावर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.