प्रतिनिधी/ बेळगाव
35 जे कवी माणसं वाचतात तेच कवी कविता करतात. समाजातील वेगवेगळय़ा घटना कवितेच्या माध्यमातून समोर आणतात. संमेलनातील तिसऱया सत्रात ‘नशीब’, ‘मायबाप’, ‘आई’, ‘ये हे हिंदुस्थान’, ‘मयत’, ‘मैत्री’, ‘सासू’ अशा समाज भाष्यावर कविता सादर करून कविसंमेलनात रंगत आणली.
यावेळी वाशी (मुंबई) येथील कवी जितेंद्र लाड यांनी ‘दोघांच्या गावाचे आंतर जरी आहे, तु माझा मी तुझा खांदेकरी आहे’, ‘कळेनासे झाले कशी रुजवावी गाथा, ओ मय माय बापाच्या नशिबी लेकराच्या लाथा’, ‘माझ्या जगण्याचे बळ तुझ्या डोळय़ांची करुना, लाख दिव्यांचा महाल आईविना सुना’ या कवितातून आई-बाबाची व्यथा मांडून बापाचे महत्त्व स्पष्ट केले.
यानंतर अकोला येथील कवी अनंत राऊत यांनी, ‘कवितेमधून जगाला काळीज वाटतो मी, वरचा समाज शिवतो आतून फाटतो मी’ या कवितेतून समाजातील भीषण वास्तव रसिकांपुढे मांडून टाळय़ांची दाद मिळविली. ‘कशाला वाचला चेहरा, पुस्तके वाचणाऱयाने, उभा रस्ता बदलणाऱया एका इशाऱयाने’ या कवितेतून सौंदर्यावर प्रेम करणाऱयांनी पुस्तके वाचून पुस्तकांच्या प्रेमात पडा, असे सांगितले.
‘जगणे कसे मरणे जसे, सूचना मी, बायकोला सोडू कसे’ या कवितेतून दैनंदिन जीवनात पत्नीची होणारी धावपळ दाखवून दिली. तसेच ‘नशीब’ कविता सादर केली. सोलापूर येथील कवी तालिब सोलापुरी यांनी ‘तेरे रूप का काजल माझ्या डोळय़ात भरशील का’, ‘रसाळ डोळे, तरार चेहरा, त्या पापण्या सलाम देना’, ‘फू फू जी हामे छोडकू दिल तोडकू’ या कवितेतून एका मयात झालेल्या ‘सासू’ व्यथा मांडून रसिकांना खळखळून हसविले.
कवी जितेंद्र लाड यांनी ‘स्वातंत्र्याच्या अंगणात नांदते लोकशाही’ या कवितेतून स्वतंत्र भारतातील शेतकऱयांची घुसमट कवितेच्या माध्यमातून सादर केली.