अशोक गेहलोत यांचे विधान
जयपूर :
राजस्थानात मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पुन्हा राजकीय खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सरकार पाडविण्याचा खेळ पुन्हा सुरू होणार असल्याचा आरोप केला आहे. राजस्थानसह महाराष्ट्रातही सरकार पाडविण्याचा प्रयत्न सुरू होणार असल्याचे गेहलोत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले आहे.
अमित शाह आमच्या आमदारांना बसवून चहा पाजवत होते आणि 5 सरकारे पाडविली असून 6 वेही कोसळविणार असल्याचे सांगत होते. धर्मेंद्र प्रधान आमदारांचे मनोबळ वाढविण्यासाठी न्यायाधीशांशी चर्चा करणार असल्याचे म्हणत होते, असा आरोप गेहलोत यांनी केला आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी भाजपचा दाखला देत माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर निशाणा साधल्याचे मानले जात आहे.