नागरिकांसाठीही संचारबंदी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात रविवारी सकाळपासून सोमवारी पहाटेपर्यंत टप्प्याटप्याने ताऊक्ते वादळाची तीव्रता जाणवणार असल्याने लोकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी 1 दिवसाचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आह़े नागरिकांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर घरातच थांबावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आह़े अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठीही संचारबंदी असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल़े जिल्हय़ात वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन एनडीआरएफच्या संपर्कात असून गरज पडल्यास या टीमला पाचारण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये दिल़ी
किनारपट्टीवरील राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली व मंडणगड या 5 तालुक्यांमध्ये कडक लॉकडाऊन व संचारबंदी या वादळाच्या कालावधीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितल़े तसेच कोविड हॉस्पीटलमधील वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्यामुळे पर्यायी विजेची सोय करण्यासाठी जनरेटर, इनव्हर्टरची व डिझेलची सोय करण्यात आली असून कोविड रुग्णासांठी 20 मेट्रीक टन ऑक्सिजनची सोय केली आहे. ऑक्सिजन कोल्हापूर जिल्हय़ातून आणण्यात येणार आहे. दरम्यान किनारपट्टीनजीक 5 ते 10 किमी परिसरात नुकसान होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
या वादळात पुराची शक्यता कमी आह़े झाडांची पडझड, विजेचे खांब व पत्र्याची शेड यांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितल़े महावितरणच्या 44 टीम तयार करण्यात आला आहेत़ तसेच प्रत्येक तालुक्यात विविध स्वयंसेवी संस्थाची मदत घेतली जाणार आह़े दापोली व अन्य दुर्गम ठिकाणी संपर्क तुटल्यास सॅटेलाईट फोनच्या मदतीने संपर्क साधला जाणार आह़े रविवारी रत्नागिरी तालुक्यामधील पूर्णगडमध्ये दुपारी 1 वाजता, शहर परिसरामध्ये सायंकाळी 4 वाजता व मालगुंड-जयगड येथे सायंकाळी 6 च्या दरम्यान वादळाचा प्रभाव जाणवणार असल्याची शक्यता आह़े तर दापोलीत सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत वादळ पोहोचण्याची शक्यता आहे. ताशी 40 ते 90 किमीप्रमाणे वारे वाहण्याची शक्यता आहे. 5 तालुक्यांमधील किनारपट्टीवरील गावातील नागरिकांना स्थंलातरित करणार आह़े वादळग्रस्तांना निवारागृहामध्ये स्थंलातरित करण्यात येणार आह़े
पेट्रोल, डिझेल पंप प्रशासन ताब्यात घेणार
वादळादरम्यान वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्यामुळे पेट्रोल, डिझेल पंप प्रशासनाच्यावतीने ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.