ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भारतानं लॉन्च केलेल्या 5G तंत्रज्ञानासाठी काही भाग दक्षिण कोरियातून मागवण्यात आले आहेत. मात्र, हे तंत्रज्ञान पूर्णतः स्वदेशी आहे. टेलिकॉम क्षेत्रात क्रांती करणारं हे स्वदेशी तंत्रज्ञान ज्या देशांना हवं असेल त्यांना आपण ते पुरविण्यास तयार आहोत, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी सांगितले.
जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ ऍडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सीतारामन म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी देशात 5G सेवेचा शुभारंभ केला. सध्या निवडक शहरांमध्ये ही सेवा सुरू झाली असून, 2024 पर्यंत संपूर्ण देशभरात ही सुविधा उपलब्ध होईल. अल्ट्रा हायस्पीड इंटरनेट सेवा पुरवण्यास सक्षम असलेल्या 5G सेवेमुळे नव्या आर्थिक संधी आणि सामाजिक लाभ मिळतील, अशी अपेक्षा आहे.
अधिक वाचा : शैक्षणिक स्वायत्ततेसाठी थेट यूजीसीकडे अर्ज करता येणार
आपल्या देशात लॉन्च झालेलं हे तंत्रज्ञान इतर देशांतून आयात केलेलं नाही ते संपूर्ण स्वदेशी आहे. त्यामुळं भारतीयांना अभिमान वाटला पाहिजे, असेही सीतारामन यावेळी म्हणाले.