राज्यसरकारची ‘अमृतज्योती’ योजना : आजपासून नोंदणीला सुरुवात
प्रतिनिधी/बेळगाव
अनुसूचित जाती-जमातींमधील नागरिकांना 75 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची ‘अमृतज्योती’ योजना सुरू करण्यात आली आहे. बीपीएल कार्डधारकांसाठी ही योजना असून 15 ते 30 ऑक्टोबर दरम्यान नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अनुसूचित जाती-जमातींमधील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील अनेक घरांमध्ये आजही विजेचे कनेक्शन नाही. त्यामुळे प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारने यापूर्वी अमृतज्योती योजना सुरू केली होती. परंतु त्याचा तितकासा प्रचार न झाल्याने अत्यंत कमी प्रमाणात नोंदणी झाली होती. त्यातच या योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या नोंदणी प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या. नुकतीच ऊर्जा मंत्री सुनीलकुमार यांनी बेंगळूर येथे बैठक बोलावून तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी अधिकाऱयांची कानउघडणी केली.
आतापर्यंत या योजनेसाठी 2.50 लाख नागरिकांनी अर्ज केला आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत 10 लाख नागरिकांची नोंदणी होण्याची शक्मयता आहे. प्रत्येक वीज वितरण कंपनीला या संदर्भात माहिती देण्यात आली असून गावोगावी प्रचार करण्यास सांगण्यात आले आहे. ज्या नागरिकांना अमृतज्योती मार्फत वीज कनेक्शन मंजूर होईल त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत कनेक्शन देण्यात यावे असे ऊर्जामत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे अनुसूचित जाती-जमातीतील नागरिकांच्या प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचण्यास मदत होईल.
ट्रान्स्फॉर्मर आणि फिडर मेंटेनन्स अभियान…
ट्रान्स्फॉर्मर आणि फिडर यांची वेळोवेळी तपासणी केली जात नसल्याने विद्युत साहित्याचे नुकसान होते. त्यामुळे तांत्रिक खर्चामध्ये वाढ होत आहे. राज्यातील विद्युत विभागाने 1 ते 15 नोव्हेंबर व 1 ते 15 डिसेंबर या दरम्यान ट्रान्स्फॉर्मर आणि फिडर मेंटेनन्स अभियान राबविण्याची सूचना ऊर्जा मंत्र्यांनी केली आहे.