गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांचे उद्गार, ‘वुई फॉर फातोर्डा’तर्फे रक्षाबंधन समारंभ
प्रतिनिधी /मडगाव
फातोर्डा मतदारसंघाने लोकांच्या सहभागाने जो विकास वेगाने हाती घेतला आहे तो गोवा राज्याला अधिक प्रगतशील करेल, असा विश्व्ा्रास गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष असलेले स्थानिक आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे. वुई फॉर फातोर्डाने आयोजित केलेल्या रक्षाबंधन समारंभात सरदेसाई बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, फातोर्डा फॉरवर्डचे अन्य सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते रामदास हजारे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांनी आमदार सरदेसाई, पेरेरा, हजारे आणि इतरांना राख्या बांधल्या.
हा कार्यक्रम फातोर्डाची सर्वसमावेशकता दर्शवतो, असे सरदेसाई पुढे म्हणाले. फातोर्डा मतदारसंघाच्या विकासावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, महिलावर्ग ही मतदारसंघातील परिवर्तनाची प्रेरक शक्ती आहे आणि विकासाच्या बाबतीत यशात त्यांचेही मोठे योगदान आहे. विशेषता कोविडच्या लॉकडाऊनच्या दरम्यान फातोर्डाच्या महिलांनी सर्व सहकार्य केले आणि समाजाला मदत केली. कोविड काळ कितीही कठीण असला, तरी फातोर्डाच्या महिलांनी समाजकार्यात योगदान देऊन बदल घडवून दाखविला आहे, असे ते पुढे म्हणाले.
महिला सशक्तीकरणासाठी नवीन योजना जाहीर
या कार्यक्रमात सरदेसाई यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी नवीन योजना जाहीर केल्या. ते म्हणाले की, नवीन ‘फूड कोर्ट’ आणि सार्वजनिक केंदे पूर्णपणे महिला चालवतील. त्यांनी महिलांच्या क्षमतेचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, यंदा 2 ऑक्टोबर रोजी त्यांचा पक्ष ओपिनियन पोल स्क्वेअर येथे ई-कार्ट सुरू करेल. राज्यातील स्त्रियांनी पुढे येऊन आपले लक्ष्य व प्रगती साध्य करावी, असे ते म्हणाले.
राज्यातील सर्व महिला सुरक्षित राहणार याची खात्री गोवा फॉरवर्ड देणार आणि महिलांच्या सुरक्षेबाबत भाजपचा निष्काळजीपणा व अक्षमता तातडीने संपुष्टात आणणे आवश्यक आहे. गोव्याची प्रतिमा भाजप सरकारने बिघडवून टाकली आहे. ती पुन्हा मिळवण्याची गरज आहे. त्यात महिलांना सुरक्षा मिळेल आणि आमची संस्कृती जपली जाईल, असे सरदेसाई यांनी पुढे सांगितले.
फातोर्डाला आदर्श मतदारसंघ बनविले : हजारे
या कार्यक्रमात बोलताना माजी नगरसेवक रामदास हजारे यांनी गोवा फॉरवर्डच्या नेतृत्वाची व विजय सरदेसाई यांची प्रशंसा केली आणि राज्यात फातोर्डा एक आदर्श मतदारसंघ बनवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. हजारे यांनी म्हटले की, त्यांनी सरदेसाई यांची साथ कधीच सोडलेली नाही आणि दरवषी रक्षाबंधनासाठी ते उपस्थित राहतात. फातोर्डा एक आदर्श आणि उत्कृष्ट मतदारसंघ बनवण्यासाठी आपण सक्रियपणे समाजकार्यात परत यावे असा आग्रह सरदेसाई यांनीच धरला होता आणि त्या दिशेने आपण काम करत आहे, असे ते म्हणाले. त्यांनी असेही नमूद केले की, त्यांच्या मूळ सांखळी गावामध्ये रहिवाशांसाठी कोणताही विकास झालेला नाही किंवा तरुणांना नोकऱया मिळालेल्या नाहीत. त्यांनी सरदेसाई यांना विनंती केली की, गोमंतकीय युवकांना नोकऱयांमध्ये प्राधान्य मिळेल व राज्याचा विकास होईल अशी हमी जाहीरनाम्यात द्यावी. फातोर्डातील महिलांना व अन्य लोकांना गोवा फॉरवर्डने दिलेल्या संधीचा उपयोग करून घ्या आणि आयुष्यातील सर्वोत्तम साध्य करण्यासाठी पुढे जा, असे आवाहन हजारे यांनी केले.