प्रतिनिधी /खानापूर
खानापूर न्यायालयात रविवारी मेगा लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदलातचे उद्घाटन बेळगाव मुख्य जिल्हा न्यायाधीश सी. एम. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कायदा सेवा समिती सेक्रेटरी विजय अर्स तसेच खानापूर न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश पी. मुरलीमोहन रेड्डी, एस. सूर्यनारायण उपस्थित होते.
उद्घाटनानंतर बोलताना जिल्हा न्यायाधीश सी. एम. जोशी म्हणाले, लोकअदालत पक्षकारांच्या हितासाठीच असतात. यामुळे पक्षकारांनी लोकअदालतचा जास्तीत जास्त लाभ उठवावा व राजी व संधान पद्धतीते घ्यावा, असे आवाहन केले. पहिल्याच दिवशी चेक बाऊन्स, वाटणी, वाळू तस्करी इत्यादी मिळून 82 दावे निकालात काढण्यात आले. त्यामधून त्यांच्याकडून एकूण महसूल दीड कोटी रुपये इतका वसूल करण्यात आला.
यावेळी विविध पतसंस्था, बँकांचे सचिव, पक्षकार, तसेच ऍड. एस. एस. कपिलेश्वरी, ऍड. आर. एन. पाटील, ऍड. आय. एन. नाईक, ऍड. के. जी. कळ्ळेकर, ऍड. ए. डी. लोकरे, ऍड. एच. एन. देसाई, ऍड. पी. वाय. पडीपाटील, ऍड.एम. ए. मुल्ला आदी उपस्थित होते. सदर लोकअदालत दि. 12-03-2022 पर्यंत चालणार आहे. या लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त दावे ऍड. केशव कळ्ळेकर यांनी हिरीरीने भाग घेऊन निकालात काढल्याबद्दल त्यांचाही जिल्हा न्यायाधीशांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तरी याचा फायदा सर्व पक्षकारांनी घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.