राज्यातील पहिली शेतकरी कंपनी
सांखळी/ प्रतिनिधी
शेतीप्रधान गोव्यात युवा पिढीने विशेष रुची दाखवताना आधुनिक तंत्राचा वापर व त्याच्या जोडीला प्राकृतिक सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज असुन पुढील पन्नास वर्षांचे उद्दिष्ट ठेवून राज्य सरकारने शेतीसाठी अनेक योजना व भरमसाठ सवलती उपलब्ध केल्या आहेत. आजही शेतकरी वर्गाला चांगला भाव व योजनांची माहिती मिळत नसल्याने फार्मर्स कंपनीच्या माध्यमातुन अनेक बाबतीत शेत करी वर्गाला मोठी उपलब्धी गाठणे शक्मय होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले
केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने राज्यातील पहिल्या बिचोलिम प्रोग्रेसिव्ह फार्मर्स प्रोडय़?सर् कंपनी लिमिटेड चे उदघाटन रवींद्र भवन साखळी येथे करण्यात आले. व्यासपीठावर आमदारं डॉ चंद्रकांत शेटय़?, आमदार प्रेमेंद्र शेट, कृषी संचालक नेव्हिल अल्फान्स?, नाबार्ड चे मिलिंद भिरूड, योगेश थोरात, देशपांडे, ?ल्हा सदस्य गोपाळ सुर्लकर, महेश सावंत, प्रदीप तिरोडकर, नीलिमा गावस , कंपनी अध्यक्ष विश्व?भर गावस आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्यात बारा शेतकरी कंपनी स्थापन करून नव्या योजना हाती घेणार, प्रत्येकाने आत्मनिर्भर व्हावे हा उद्देश आहे. गोवा नैसर्गिक शेतीसाठी प्रसिद्ध आहे शेणखत व इतर सेंद्रिय खते, प्राकृति क शेतीच्या माध्यमा तून समूह शेतीच्या माध्यमातून अनेक उद्दि÷s साध्य करीत शेती व्यवसायात क्रांती घडवणे शक्मय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गों वन ब्रॅण्ड अंतर्गत अनेक उत्पादने केली जात आहेत. कुणबी साडी उत्पादन राज्यात सुरु केले असुन देशपातळीवर मोठी मागणी आहे असेही डॉ सावंत यांनी सांगितले. आमदार डॉ शेटय़? यांनी नव्या योजना व तरुणाईचा सहभाग वाढला तर शेतीला मोठी गती मिळणे शक्मय आहे. प्रत्येकाने शेतीत रुची दाखवावी असे संगितले.
प्रेमेंद्र शेट यांनी शेतकरी कंपनीची संकल्पना पूरक असुन त्यामुळे उत्पादन विक्रीत वाढ होताना शेतकरी वर्गाचा आत्मविश्वास वाढेल या साठी ही योजना वरदान ठरणार असल्याचे सांगितले. नेल्व्हिन अल्फ?न्स?,थोरात , देशपांडे यांनी माहिती दिली.
मार्केट यार्ड साखळी येथे शेतकरी कंपनी कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. विश्व?भर गावस यांनी कंपनीची माहिती दिली. विश्वास चोड ण क रं यांनी आभार मानले.