प्रतिनिधी/ रत्नागिरी
केंद्र व राज्य सरकारने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी टाळेबंदीतून मुभा देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱयांकडे नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिह्यात आतापर्यंत 4500 हजारहून अधिक लोकांनी परराज्यात जाण्याकरीता नावनोंदणी केली आहे. या लोकांना वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक केल्यामुळे †िठकठिकाणी त्यांची गर्दी रूग्णालय परिसरात उसळली आहे.
राज्य सरकारने राज्यामध्ये अडकलेल्या मजूरांना मूळ गावी जाण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता दिली आह़े ग्रीन व आँरेज क्षेत्रातील लाकडाऊनचे नियम शिथिल करुन राज्यातील मजूरांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत़ त्यानुसार काही मजूरांना मूळ गावी जाण्यासाठी खास श्रमिक रेल्वेद्वारे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होत़ी तसेच मुळगावी जाण्यासाठी हे मजूर वैद्यकीयदृष्टय़ा सुदृड आहेत. त्यांना कोरोनाची लक्षणे ताप, सर्दी, खोकला इत्यादी नसल्याची खात्री करुन वैद्यकीय तपासणी करुन त्याबद्दलचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आह़े त्यानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयात मजूरांनी मोठया प्रमाणात गर्दी पेली होत़ी सुमारे 150 ते 200 मजूरांनी हे प्रमाणपत्र घेण्यासाठी रुग्णालयात केली होत़ी बहुसंख्य मजूर हे उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश येथील आहेत़ या सर्व मजूरांची योग्य तपासणी करुन त्यांना ताप, सर्दी, खोकला नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आह़े
वैद्यकीय तपासणी करताना मजुरांच्या शरीराचे तापमान, रक्तदाब, तसेच त्यांना ताप, सर्दी, खोकला नसल्याची तपासणी करण्यात येत आह़े त्याच बरोबर या मजूरांचा प्रवासाचा काही इतिहास आहे का याची सुध्दा चौकशी करण्यात येत आह़े दुपारपर्यंत 60 ते 70 मजूरांची तपासणी झाली होती. जिल्हा शासकीय रुग्णालयातील 3 डाक्टरांचे व परीचारकांचे पथक ही तपासणी करुन वैद्यकीय प्रमाणपत्र दिली जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक बोल्डे यांनी दिल़ी तसेच रुग्णालयात झालेली गर्दी पाहता आणखी डॉक्टर व परीचारकांची पथक तपासणी करण्यासाठी नेमण्यात आली असल्याचे डॉ बोल्डे यांनी सांगितल़े
एका वेबपोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रत्नागिरी जिह्यातून राज्याबाहेर जाणाऱया लोकांची नोंदणी सुरु आहे. आतापर्यंत साडेचार हजार हून अधिक लोकांनी राज्याबाहेर जाण्यासाठी परवानगी मागितली आहे. हा ओघ सतत वाढता आहे. या लोकांनी वैध परवान्याशिवाय जिह्याबाहेर जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या अर्जांवर प्रक्रिया करण्याचे काम सुरु आहे.