प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन
प्रतिनिधी / मिरज
द्राक्ष व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी द्राक्षबागायतदारांनी विक्रीवेळीच योग्य तो कायदेशीर करार करावा. व्यापाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी. एखाद्या व्यापाऱ्याबाबत साशंकता वाटल्यास ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी प्रथम व्यापाऱ्यांची किंवा एजन्सीची कागदपत्रे तपासावीत, व्यापाऱ्यांकडे आधार कार्ड असल्यास करारामध्ये त्याची नोंद करावी, योग्य करार होत नसल्यास अशा व्यापाऱ्याबरोबर बागायतदारांनी खरेदी-विक्री व्यवहार करु नयेत. किंवा एखाद्या व्यापाऱ्याबाबत साशंकता वाटल्यास संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा आणि होणारी फसवणूक टाळावी, असे आवाहनही मिरखेलकर यांनी केले.