जान्हवी पाटील/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हय़ात रिजनल प्लॅन न झाल्याने जिल्हय़ाला ग्रामपंचायत स्तरावर घर बांधणी परवानगी देण्याच्या निर्णयातून वगळण्यात आले आहे. याचवेळी नोव्हेंबरमध्ये परिपत्रक निघूनही कार्यालय केवळ कागदावरच राहिले आहे. कार्यालय सुरु होण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान दोन ते तीन महिने लागणार असून त्यानंतर पदभरती होणे शक्य आहे. यामुळे जिह्याचा रिजनल प्लॅन तयार होण्यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी जाईल, अशी माहिती रत्नागिरी नगररचनाकार विभागाचे अधिकारी मिलिंद आवडे यांनी दिली.
शासनाच्या नगर विकास विभागाची एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावली 2 डिसेंबर 2002 रोजी लागू झाली होती. या नियमावलीत रत्नागिरी जिल्हय़ातील नगर पालिका क्षेत्र वगळून उर्वरीत संपूर्ण क्षेत्र शेती विभागात समाविष्ट झाले होते. त्यामुळे जिल्हय़ातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर 14 जानेवारी 2021 रोजीच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचेनुसार रत्नागिरी जिल्हय़ाची प्रादेशिक योजना प्रसिध्द होईपर्यंत 2013 ची प्रादेशिक योजना नियमावली कायम ठेवली आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यात रत्नागिरी जिल्हा वगळून ग्रामीण क्षेत्रातील इमारत बांधकाम परवानगीबाबत सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांमध्ये बांधकाम परवानगीबाबतचे निकष निश्चित केले असून त्यानुसार 150 चा.wमी. पर्यंतचे भूखंड आणि 150 ते 300 चौ.मी. पर्यंतचे भूखंड व या भूखंडावरील इमारत बांधकामासाठी मंजूर यूडीसीपीआर मधील aज्जह्ग्x-क् भूमधील विहित अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगीबाबत कार्यवाही करण्याबद्दल सूचित केलेले आहे. या बांधकाम परवानगीबाबतचे धोरण महाराष्ट्रातील रत्नागिरी वगळता सर्व जिल्हय़ांना लागू करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हय़ाचा रिजनल प्लॅन तयार नसल्याने जिल्हा वगळला गेल्याची माहिती नगर रचना विभागाकडून देण्यात आली. आता रिजनल प्लॅन तयार करण्यासाठी प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी रत्नागिरीत रिजनल प्लॅन कार्यालय सुरू करण्यासाठी 10 नोव्हेंबर 2020 रोजी परिपत्रक काढण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता या कार्यालयासाठी मंजूर असूनही पदे भरण्यातच आलेली नाहीत. पुढील 2-3 महिन्यात या कार्यालयासाठी 12 अधिकारी आणि 2 शिपाई पदे भरली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यालयासाठीही जागा निश्चित केली जाणार असून रत्नागिरी बरोबरच सिंधुदूर्ग अशा दोन्ही जिल्हय़ांचा रिजनल प्लॅन एकत्र केला जाणार आहे. हा संपूर्ण प्लॅन तयार होण्यासाठी साधारणतः 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागणार आहे.
रत्नागिरीत लवकरच या प्लॅनसाठी सहायक संचालक, नगर रचना, प्रादेशिक योजना रत्नागिरी-सिंधुदूर्ग कार्यालय अल्ल्सतत्वात येणार आहे. या कार्यालयासाठी सहायक संचालक 2, रचना सहायक 1, संशोधन सहायक 1, अधीक्षक 1, सहायक आरेखक 1, कनिष्ठ आरेखक 2, सांख्यिकी सहायक 1, कनिष्ठ लिपीक 1, निलमुद्रक 1, दप्तरबंद 1, शिपाई 2 अशी 14 पदे भरली जाणार आहेत.