प्रतिनिधी / बेळगाव : श्री विसर्जन मिरवणुकीत चाकूने भोसकून एका तरुणाचा भीषण खून करण्यात आला आहे. शनिवारी रात्री यरगट्टी तालुक्यातील मुगळीहाळ येथे हि घटना घडली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चौघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अर्जुनगौडा पाटील ( वय 21 ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो महाविद्यालयीन विद्यार्थी होता. मिरवणुकीवेळी पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादावादीनंतर अर्जुनगौडावर चाकूहल्ला करण्यात आला. हल्ल्यात तो जाग्यावरच कोसळला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मुरगोड पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Previous Articleसावंतवाडी शहरात पावसाची संततधार
Next Article हुलीकट्टीत पावसाने भिंत कोसळून महिलेचा मृत्यू