काँग्रेस नेते शशी थरूर यांनी बुधवारी नविन विरोधी पक्षांच्या आघाडी INDIA समोर आघाडीचे नाव बदलून भारत असे ठेवले जावे असा प्रस्ताव ठेवला. असे ठेवल्यानेच कदाचित भाजप सरकार देशाचे नाव बदलणार नाही असे म्हणून भाजपवर खोचक टिका केली.
सध्या देशात भारत कि इंडिया असा वाद सुरु असताना विविध नेत्यांनी यावर आपल्य़ा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करताना म्हटले आहे कि, “आपण BHARAT याचा अर्थ ‘Betterment, Harmony And Responsible Advancement for Tomorrow’ म्हणजेच ‘उद्यासाठी चांगल्या गोष्टी, सुसंवाद आणि प्रगती जबाबदार’ असा होऊ शकतो. असे केल्यानेच भाजपची नावे बदलण्याचा फसवा खेळ थांबेल.” असे म्हणून त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
राष्ट्रपती कार्यालयाने 9 सप्टेंबर रोजी नेहमीच्या ‘प्रेझिडेंट ऑफ इंडिया’ या शब्दाऐवजी ‘भारताचे राष्ट्रपती’ अशा शब्दाचा प्रयोग करून G20 डिनरसाठी आमंत्रणे पाठवली. भाजपच्य़ा या निमंत्रणपत्रिकेवरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार आरोपप्रत्यारोप होत असतानाच त्यांनी आपल्या नविन आघाडीच्या आयोजकांना या सुचना करून भाजपवर खोचक टिका केली.
17 आणि 18 जुलै रोजी बेंगळूर, कर्नाटक येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी आपल्या नविन युतीचे नाव INDIA असे ठेवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आघाडीची तुलना बंदी घातलेली दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीन आणि पूर्वेकडील वसाहतवादी ईस्ट इंडिया कंपनीशी करून य़ा आघाडीवर हल्लाबोल केला होता. भारताची बरोबरी ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन मुजाहिदीन यांच्याशी केल्याबद्दल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी भाजपला प्रत्युत्तर दिले.