गुणमिलन पद्धतीमध्ये एकूण 36 गुण असतात. 8 पॅक्टर्स किंवा विषय आणि प्रत्येक पॅक्टरला ठरावीक गुण असा हा साचा आहे. सुऊवात होते वर्ण (म्हणजेच जात, पण ही जात सामाजिक नाही तर ज्योतिषीय असते) ज्याला एक गुण, वश्य(इमोशनल अटॅचमेंट किंवा एकमेकांविषयी असणारे आकर्षण) त्याला दोन गुण, तारा (नक्षत्रानुसार भाग्योदय) याला तीन, योनी(सेक्सुअल कंपटीबिलिटी- शरीरसुख घेण्याची-देण्याची वृत्ती) याला चार, गृहमैत्री (आपापसात किती जमेल) याला पाच, गण(कौटुंबिक नातेसंबंध) याला सहा, भुकूट(सुख साधन किंवा संतान) याला सात गुण, आणि शेवटचे(ज्याचा सर्वाधिक प्रॉब्लेम होतो आणि याबद्दल सगळ्यात जास्त अज्ञान आहे) म्हणजे नाडी(वैवाहिक जीवनातील स्थैर्य आणि संतान). याला आठ गुण., म्हणजे 1+2+3+4+5+6+7+8 बरोबर 36! अगदी ऋषीपरासरांपासून चालत आलेल्या या गुण मिलन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांना महत्त्व दिले गेले. काही विद्वानांनुसार नाडी हा प्रकार फक्त ब्राह्मणांकरता मर्यादित होता. वैश्य समाजाने वर्णाला अधिक महत्त्व दिले. पण यालाही अपवाद किंवा मतमतांतरे आहेत. आता नाडीदोषाचा विचार केला असता जर दोघांचीही नाडी एक आली(नाडीचे तीन प्रकार: आद्य, मध्य आणि अंत्य) मुळात नाडी हा प्रकार आयुर्वेदातील वात पित्ताने कफ या संकल्पनेवरून घेतला गेलेला आहे असे मला व्यक्तिश: वाटते. 27 नक्षत्रांना नऊच्या भागात भागून प्रत्येक भागाला एका नाडीची संज्ञा दिली गेली. आयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी समान दोष असलेल्या व्यक्तींना समान स्वरूपाचे आजार होऊ शकतात. कदाचित हे त्यामागचे कारण असावे. तर अशा जोडप्यांनी विवाह करू नये. संतती होण्याकरता किंवा नंतरच्या पिढीला काही प्रॉब्लेम होऊ शकतो असे मत तयार झाले असावे. दाते पंचांगात अभिनव विवाह कोष्टकात नाडी पाद वेध नावाचा प्रकार अतिशय सुंदररित्या मांडला आहे. नाडी जरी एक असली तरी चरणांच्या पॅलक्मयुलेशनने हा दोष नाहीसा होऊ शकतो हेच बऱ्याच लोकांना माहीत नसते. यात मूर्खपणाचा कळस म्हणजे काही लोकांचे म्हणणे असे की एक नाडी असेल तर ब्लड ग्रुप चेक करा, जर ब्लड ग्रुप वेगळा असेल तर बिंदास विवाह करण्यास हरकत नाही. यासारखी बिनबुडाची गोष्ट दुसरी नाही. ज्योतिषशास्त्रा बरोबरच आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील काही टेस्ट जशा VDRL for Syphilis Testing,- HIV I & II, Hepatitis-B Screening,- Hepatitis-C Virus Infectious diseases like HIV, Hepatitis B Virus (HCV), Hepatitis B Virus (HBV), Syphilis and Sexually Transmitted Disease (STD) ( करून घेणे हे (पुढे जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा) प्रत्येक होणाऱ्या नववधू आणि वराला अत्यंत गरजेचे आहे, सुज्ञानी यावर विचार करावा. तर मग सर्वसाधारणपणे अष्टकूट मिलनापैकी कोणत्या पॅक्टरना जास्त महत्त्व द्यावे? खरंतर हा ज्याचा त्याचा प्रŽ आहे. माझ्या मते नाडीपेक्षा योनीला जास्त महत्त्व आहे. सगळ्यात जास्त महत्त्व षडाष्टकाला आहे. त्यातही मृत्यू षडाष्टक आणि प्रीती षडाष्टक हे दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत. जर दोन व्यक्ती एकमेकांच्या सहवासात मुळीच राहू शकत नाहीत आणि मृत्यूतुल्य कष्ट होतात(मृत्यू होत नाही!) तर विवाह न करणेच योग्य नाही का? मंगळाचा अति केलेला बाऊ यासंदर्भात मी अगोदरच लिहिले आहे. साधारण 14 कंडिशन्स आहेत अशा जिथे मंगळाचा दोष नाहीसा होतो. मंगळदोष हा लग्नावरून, चंद्रावरून आणि शुक्रावरून पाहिला जातो. आणि मुळात संपूर्ण आयुष्यात जेव्हा आपण सगळेच कित्येकदा मांगलिक होतो तर मग इतका मोठा प्रŽ निर्माण करण्याची गरज नाही. पुढच्या लेखामध्ये योग्य जीवन साथी मिळावा, लवकर विवाह जुळून यावा यासाठी करावयाचे उपाय सांगतो.
मेष
जिभेवर ताबा ठेवा. बोलण्यात आणि खाण्या पिण्यामध्ये जर चूक झाली तर महागात पडू शकते. तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीविषयी जर वाद असतील तर सामोपचाराने मिटविण्याकडे कल ठेवा. कौटुंबिक समाधान चांगले प्राप्त होईल पण लहान मोठ्या कारणाने थोडीफार चिडचिड होऊ शकते.
उपाय धार्मिक स्थळी मुळा ठेवून यावा
वृषभ
पूर्वी ज्याला मदत केली होती अशी व्यक्ती तुमच्या मदतीला येऊ शकते. कुटुंबातील ताण-तणाव निवळण्याकरिता थोडाबहुत प्रयत्न करावा लागेल. विशेषत: संततीबाबत सबुरीने घेणे श्रेयस्कर ठरेल. योजनांना प्रत्यक्षात आणण्याकरता इतरांची मदत घ्यावी लागली तर मागेपुढे पाहू नका.
उपाय गाईला हिरवा चारा घालावा
मिथुन
पैशांच्या देण्या घेण्यावरून काही लोकांशी वाद होऊ शकतात. आपल्या मनातील गुपित अगदी जवळच्या माणसाकडेसुद्धा बोलून दाखवू नका. पैशांच्याबाबतीत हा आठवडा सर्वसाधारण असेल. तब्येतीला अति जपण्याचे कारण नाही. तुमच्याबद्दल लोकांमध्ये आदर निर्माण होईल.
उपाय तुळशीला दूधमिश्रित पाणी घालावे
कर्क
पोटासंबंधी त्रास होऊ शकतो. कुटुंबात वर्चस्व गाजवण्याच्या नादाला लागून इतरांची मने दुखवु नयेत. वैवाहिक जोडीदाराला समजून घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त होतील. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या सल्ल्यामुळे पैशाचे नियोजन चांगल्या रीतीने करू शकाल.
उपाय सुवासिनीला सौभाग्यलंकार भेट द्यावे
सिंह
कोणालाही न मागता सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. कामे तुमच्या मनाप्रमाणे झाली नाहीत तर चिडचिड करून काही उपयोग होणार नाही याउलट आजूबाजूच्या माणसांना सोबत घेऊन कामे पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या. कौटुंबिक आणि आर्थिक समाधान मिळेल.
उपाय झोपताना घरी पांढरी मोहरी टाकावी
कन्या
तुमच्या बुद्धिमत्तेला साजेल अशी कामे तुम्हाला मिळतील. हुशारीला वाव मिळेल. घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत आनंदाने वेळ घालवाल. जुना एखादा मित्र भेटून त्याच्यासोबत क्वालिटी टाईम घालवावासा वाटेल. या सगळ्यात कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.
उपाय विहिरीमध्ये एक चमचा दूध घालावे
तूळ
कामधंद्यांमध्ये थोडी निगेटिव्ह फ़ेज येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे जे कराल ते अत्यंत सावध राहून करणे गरजेचे असेल. तुमच्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवून कामे पूर्ण करण्याकडे जोर द्यावा. जुन्या गोष्टी उघडण्यामध्ये काहीही हासिल नाही हे तुमच्या लक्षात येईल.
उपाय कुत्र्याला चपाती घालावी
वृश्चिक
कामाच्या ठिकाणी अतिआत्मविश्वास अडू शकतो. आपल्या भल्याकरता इतरांचे सगळे बोलणे मान्य करू नये. नवीन ओळखीतून आर्थिक फायदा होऊ शकतो. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकेल. संततीशी जपून वागावे.
उपाय आंब्याच्या झाडाजवळ हिरवा कपडा ठेवून द्यावा
धनु
कामधंद्याच्या ठिकाणी नवीन धोरण वापरल्यामुळे नवीन कामे मिळतील आणि त्यात यशही मिळेल. बाहेरच्या व्यक्तींशी वागताना त्यांना जास्त महत्त्व देऊन वागा; ज्यामुळे तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील. कौटुंबिक समाधान प्राप्त करण्याकरता काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागेल.
उपाय केळीच्या झाडाखालीं मातीचा टिळा लावावा
मकर
आळस सोडावा लागेल. ध्यानीमनी नसताना एखादी व्यक्ती आर्थिक मदत करू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होईल. मित्र परिवारासोबत वेळ घालवताना पैशांचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी. आर्थिक आवक सर्वसामान्य असेल.
उपाय वाहत्या पाण्यात कोळसे सोडावेत
कुंभ
मनात योजलेल्या प्रत्येक कामाला यश मिळेलच असे नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये गुरफटून न जाता भविष्याबद्दल विचार करणे जास्त सोयीस्कर ठरेल. पूर्वी भांडण झाले होते अशा व्यक्तीशी समझोता होऊन काही कामे मिळण्याची शक्मयता आहे. भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
उपाय काजळाची डबी जवळ ठेवावी
मीन
धावपळ असणार आहे. घरातील कामे आणि बाहेरची कामे यांचे संतुलन राखताना तब्येतीवर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. गरज असेल तेव्हा न चुकता दुसऱ्याचा सल्ला घ्यावा यातून फायदा होण्याचे संकेत आहेत. मनातील सगळ्या गोष्टी इतरांना सांगू नयेत.
उपाय हीना अत्तर वापरावे