डाळी, तांदूळ, गव्हाच्या किमती वाढल्याचा परिणाम ः जुलैमध्ये होती 6.7 टक्के
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तीन महिन्यांच्या घसरणीनंतर ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई दर पुन्हा 7 टक्क्मयांवर पोहोचला. डाळी, तांदूळ, गहू, भाजीपाला आदी अन्नपदार्थांच्या किमती वाढल्याने महागाई वाढल्याचे दिसून येत आहे. जुलैमध्ये 6.71 टक्के असलेला महागाई निर्देशांक ऑगस्टमध्ये 7 टक्के इतका झाला आहे. तसेच एक वर्षापूर्वी म्हणजे ऑगस्ट 2021 मध्ये तो 5.30 टक्के इतका होता.
ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ महागाईची आकडेवारी सोमवारी जाहीर करण्यात आली. किरकोळ चलनवाढ मागील सलग आठ महिने आरबीआयच्या अंदाजित 6 टक्के या मर्यादेच्या वर राहिली आहे. किरकोळ महागाई जानेवारी 2022 मध्ये 6.01 टक्के, फेब्रुवारीमध्ये 6.07 टक्के, मार्चमध्ये 6.95 टक्के, एप्रिलमध्ये 7.79 टक्के, मे मध्ये 7.04 टक्के आणि जूनमध्ये 7.01 टक्के नोंदवली गेली होती.
अन्नधान्य महागाईत वाढ
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्य प्रकारातील महागाई जुलैमधील 6.69 टक्क्मयांवरून ऑगस्टमध्ये 7.62 टक्क्मयांवर पोहोचली. जूनमध्ये अन्नधान्य महागाई दर 7.75 तर मे महिन्यात 7.97 आणि एप्रिलमध्ये 8.38 टक्के होता. वार्षिक आधारावर भाजीपाला, मसाले, पादत्राणे आणि इंधन यांचा दर 10 टक्क्मयांपेक्षा जास्त होता. तथापि, महिन्याभरात अंडी, मांस आणि मासे यांचे दर स्थिर पातळीवर राहिले.
शहरांमध्ये ग्रामीण भागात अधिक महागाई
ऑगस्टमध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात किमतीत अधिक वाढ झाली. ग्रामीण भागातील महागाई ऑगस्टमध्ये 7.15 टक्क्यांवर पोहोचली आहे, जी मागील महिन्यात 6.8 टक्क्यांवर होती. शहरी महागाई जुलै 2022 मध्ये 6.49 टक्क्मयांवरून ऑगस्टमध्ये 6.72 टक्क्मयांवर पोहोचली.
सुमारे 299 वस्तूंच्या किमतीच्या आधारावर किरकोळ महागाईचा दर ठरवला जातो. कच्चे तेल, वस्तूंच्या किमती, उत्पादन खर्च याशिवाय इतरही अनेक गोष्टी किरकोळ महागाई दर ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. चलनवाढ कमी करण्यासाठी बाजारातील अत्याधिक तरलता कमी केली जाते. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो दरात वाढ करते. वाढत्या महागाईमुळे चिंतेत असलेल्या आरबीआयने अलीकडेच रेपो दरात 0.50 टक्के वाढ करत 4.90 टक्क्यांवरून 5.40 टक्के केला होता.