प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील 186 ग्रामपंचायतींसाठी होणाऱया निवडणुकीसाठी शनिवारी सहाव्या दिवशी 1270 अर्ज दाखल झाले असून आतापर्यंतच्या अर्जांची संख्या 4724 वर पोहोचली आहे.
सोमवारी पहिल्या दिवशी 10 इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी त्यात 70 अर्जांची भर पडली. बुधवारी 203, गुरुवारी 1209, शुक्रवारी 1962 आणि शनिवारी 1270 मिळून एकूण अर्जसंख्या 4724 वर पोहोचली आहे.
येत्या दि. 10 ऑगस्ट रोजी राज्यातील 186 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार असून येत्या सोमवारी दुपारी 1 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. मंगळवार दि. 26 रोजी अर्जांची छाननी होणार आहे. बुधवार दि. 27 रोजी दुपारी 2 पर्यंत अर्ज मागे घेता येतील.
प्राप्त माहितीनुसार शनिवारी दाखल झालेल्या अर्जांमध्ये पेडणे -80, डिचोली -69, सत्तरी -89, बार्देश -245, तिसवाडी -161, फोंडा -139, धारबांदोडा -31, सांगे -48, सासष्टी -220, मुरगाव -71, केपे -73 आणि काणकोण -44, अशा एकूण 1270 अर्जांचा समावेश आहे. दि. 12 ऑगस्ट रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.