नगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर
प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपालिकेची प्रभाग रचना मंगळवारी जाहीर झाली. सलग दोन वेळा ही प्रभाग रचना रद्द झाल्याने अनेकांच्या अपेक्षेवर पाणी पडले होते. अंतिम प्रभाग रचना जाहीर होताच इच्छुकांनी प्रचारासाठी पायाला भिंगरी लावली आहे. तर दिग्गजांनी निवडणुकीच्या आधीच निकाल जाहीर केला आहे. यातच आरक्षण सोडत ही 9 जून पर्यंत होणार आहे. तरीही मीच निवडणूक लढणार असा निश्चय अनेकांनी केला आहे.
निवडणूक आयोगाने स्थानिक प्रशासनास नव्याने प्रभाग रचना तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रभागरचना निकष व नियमांनुसार तयार करण्यात आली आहे. तरीही अजुनही आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्यमान तसेच इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था पहायला मिळत आहे. प्रभाग रचनेचा अनेक दिग्गजांना फटका पडला आहे. तर काहींना फायद्याचे ठरले आहे. तसेच अनेक वर्षांपासुन वाट पाहणाऱया काही इच्छुकांना फायदा झाला आहे. शहराची हद्दवाढ झाल्याने पालिकेत आलेल्या शाहूपुरी, शाहुनगर, विलासपुर इतर भागांचा समावेश झाल्यामुळे नविन चेहऱयांना संधी मिळणार आहे. यासाठी तरुण उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. यात दिग्गज मंडळीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारी करत आहे. यामुळे सर्वत्र श्रेयवाद सुरू आहे.
इच्छुकांच्या पायाला भिंगरी
शहराची हद्दवाढ झाल्याने पालिकेत आलेल्या नविन प्रभाग रचनेनुसार शाहूनगरमधून अमोल पवार, विलासपुरमधून संग्राम बर्गे, शाहुपुरीमधून संजय पाटील, नवनाथ जाधव, भारत भोसले, तामजाईनगरमधून गणेश आरडे, गोडोलीमधून फिरोज पठाण, आशुतोष चव्हाण, तसेच अनेक नवीन नावे पुढे येत आहेत.
जास्त प्रभाव पडणार नाही
गेली पंधरा वर्षे नगरसेवक पद भुषवत आहे. नविन झालेल्या प्रभाग रचनेनुसार नव्या मतदारांपुढे सामोरे लागणार आहे. परंतु नागरिक सुज्ञ आहेत जो काम करतो त्यालाच संधी देतात.त्यामुळे नविन प्रभाग रचनेचा जास्त प्रभाव पडणार नाही.