चीनसोबतच्या तणावाप्रकरणी विदेशमंत्र्यांचे मोठे वक्तव्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गलवान खोऱयात भारत अणि चिनी सैन्यामधील हिंसक झटापटीला दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. परंतु अद्याप हा मुद्दा दोन्ही देशांमधील वादाचे प्रमुख कारण ठरला आहे. तसेच दोन्ही देशांच्या संबंधांमुळे तणाव निर्माण झाला आहे. हा मुद्दा आजही दोन्ही देशांमधील जटिल समस्या आहे. आमच्या दाव्यासोबत न्याय करणारा आणि परस्पर सहमतीवर आधारित तोडगा निघू शकेल अशाप्रकारच्या अटींवर ही समस्या आम्ही सोडवू इच्छित असल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.
अन्य देशाने यावर सुचविलेला एकतर्फी तोडगा तुम्हाला स्वीकारावा लागेल अशा प्रकारच्या अटींवर आम्ही ही समस्या सोडवू इच्छित नाही. परस्पर सहमती तसेच आमच्या दाव्यासोबत न्याय करणारा तोडगा निघाला तरच तो सीमावाद संपवू शकतो असे जयशंकर म्हणाले.
सीमावाद हा अत्यंत जटिल मुद्दा असून यात भूमी वाद देखील जोडला गेलेला आहे. याचबरोबर लोकांच्या भावना यात जोडल्या गेलेल्या आहेत. तसेच मोठा इतिहास आणि राजकारणही यात जोडलेले आहे. चीनसोबत आमचा सीमावाद 1958 पासून आहे. 60 वर्षांपासून आम्ही चर्चा करत आहोत. प्रत्यक्ष सीमेत कुठल्याही प्रकारचा फेरफार होऊ नये हे सर्वप्रथम सुनिश्चित केले जावे. परंतु दुर्दैवाने चीन जैसे थे स्थिती राखू इच्छित नाही. तो एकतर्फी कारवाई राहतो. आम्हाला हे मान्य नाही हे स्पष्ट आहे. याचमुळे आमचे सैन्य भूमीच्या रक्षणाकरता तैनात आहे. दोन वर्षांपूर्वी जे घडले ते सगळय़ांनाच माहित आहे. तरीही आम्ही तोडगा इच्छित आहोत. परंतु एखादा देश आमच्यावर कुठलाही तोडगा थोपवू पाहत असल्यास आम्हाला तो कदापिही मान्य नसेल असे विदेश मंत्री जयशंकर यांनी चीनला सुनावले आहे.