उग्रवादी संघटना हिंसेचा मार्ग सोडण्यास तयार
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारने एका दशकाहून अधिक काळापासून सक्रीय झेलियांग्रोंग युनायटेड प्रंट (झेडयुएफ)सोबत मंगळवारी नवी दिल्लीमध्ये शांतता करार केला आहे. या कराराच्या अंतर्गत उग्रवादी संघटना मणिपूरमध्ये शांतता प्रक्रियेला चालना देण्यास सहमत झाली आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्रालय तसेच राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि झेडयुएफच्या प्रतिनिधींनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. सशस्त्र समूह झेडयुएफच्या प्रतिनिधींनी हिंसेचा मार्ग सोडण्यावर आणि घटनेंतर्गत शांततापूर्ण लोकशाहीवादी प्रक्रियेत सामील होण्यावर सहमती दर्शविली आहे. या करारात झेडयुएफच्या सशस्त्र सदस्यांच्या पुनर्वसनाची तरतूद आहे. कराराच्या अंतर्गत मूलभूत नियमांच्या अंमलबजावणीच्या देखरेखीसाठी एक संयुक्त देखरेख समुहाची स्थापना केली जाणार आहे.