ऑनलाईन टीम / पुणे :
गुरुवारी पहाटे मुंबई आणि पुण्यात आगीच्या दोन घटना घडल्या. दोन्ही घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याजवळील कुरकुंभ एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली. या आगीत कंपनी जळून खाक झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तर दुसरीकडे चेंबूर रेल्वे स्टेशनबाहेरील बाजारपेठेत आग लागल्याची घटना सकाळी घडली. या आगीत काही दुकाने जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या आणि काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवत आग विझविण्यात आली आहे.