प्रतिनिधी / मिरज
कोरोना महामारीमुळे युपीएससी आणि एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा लांबणीवर पडल्याने परिक्षेसाठी पात्र उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परगावी राहून शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांचा परीक्षा शुल्कसह राहण्यापिण्याचा खर्च घरभाडे, मार्गदर्शन केंद्राचा खर्च आदी आर्थिक भार विद्यार्थ्यांवर पडला आहे.
त्यामुळे शासनाने स्पर्धा परिक्षेतील विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करावे, अशी मागणी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या विषयावर मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.